China Economic : कोरोनाने चीनचा वाजवला बॅन्ड, ५० वर्षांत सर्वात कमी विकासदर

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या शांघायसारख्या शहरांत दीर्घकालीन लॉकडाऊन केले गेले. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले. लोकसंख्येत घट चीनच्या विकासावर परिणाम करणारी आहे.

China Economic : कोरोनाने चीनचा वाजवला बॅन्ड, ५० वर्षांत सर्वात कमी विकासदर
चीनची अर्थव्यवस्था घसरली आहे. Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 8:15 AM

बिजिंग : मागील वर्षी कोरोनावर मात करण्यासाठी चीनने झीरो कोविड धोरण राबवले. मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले. त्यांच्या या धोरणाची किंमत विकासाला (China Economic)घरघर लावून चीनला मोजली लागत आहे. चीनच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये चीनचा विकासदर केवळ ३% राहिला. ५० वर्षांतील हा दुसरा नीचांक आहे. यापूर्वी १९७४ मध्ये २.३ टक्के विकास दर होता.२०२१ मध्ये चीनचा विकास दर ८.१ टक्के होता. चीन सरकारने २०२२ साठी ५.५% विकास दराचे उद्दिष्ट ठरवले, परंतु ते गाठण्यात अपयश आले. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या शांघायसारख्या शहरांत दीर्घकालीन लॉकडाऊन केले गेले. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले. चीनच्या जीडीपीचा आकार २०२१ मध्ये १८ हजार अब्ज डॉलर होता. आता १७ हजार ९४० अब्ज डॉलरवर घसरला आहे.

भारताला थेट लाभ शक्य : 

चीनमधील उत्पादन घटले आहे. म्हणजेच निर्यात कमी झाली. म्हणूनच जगासाठी चीनचा पर्याय ठरण्याची संधी भारताकडे आली आहे. आता भारतात नोकऱ्या वाढण्याची मोठी शक्यता आहे.भारतातील निर्यात वाढल्यामुळे व्यापारातील तोटा कमी होईल. यातून डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट होईल. परदेशी गुंतवणूकदार चीनऐवजी आता भारताला महत्त्व देऊ शकतात. आशियात भारताचे वर्चस्व वाढेल. भारत ट्रेड लीडर होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.

हे सुद्धा वाचा

लोकसंख्येत मोठी घट :  चीनचे लोकसंख्या धोरण आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरले आहे. चीनच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे. २०२१ पासून चीन सरकारने एकपेक्षा अधिक मुल जन्माला घालण्यास प्रोत्सहान दिले आहे. चीनमध्ये १९७१ नंतर सर्वात कमी जन्मदर आहे. भारत चीनच्या तुलनेमध्ये दहा वर्षांनी तरुण आहे. चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय ३८.४ वर्षे आहे. भारतात ते सरासरी २८.७ वर्षे आहे.चीनमध्ये २०२२ मध्ये ९५ लाख ६ हजार मुले जन्माला आली तर १ कोटी ४ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजेच जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर जास्त झाला.

भारत टाकणार चीनला मागे :  चीनची लोकसंख्या १४१.२ कोटी आहे. भारताची अंदाजित लोकसंख्या १४०.८ कोटी आहे. यंदाच्या पहिल्या सहामाहीत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार आहे. चीनची कमी होणारी लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासातील अडथळा ठरू लागली आहे. भारताला युवा लोकसंख्या फायदेशीर ठरत आहे. चीनच्या तुलनेत भारताची उत्पादन क्षमता आता वाढणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.