AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या नाकीनऊ आणणाऱ्या बलुच आर्मीकडे किती सैन्य? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बलुच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. बलुच आर्मीने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका ट्रेनचं अपहरण देखील केलं होतं. बलुचिस्तानमधील बंडखोरांकडून सातत्यानं पाकिस्तानी आर्मीवर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाकिस्तानच्या नाकीनऊ आणणाऱ्या बलुच आर्मीकडे किती सैन्य? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
| Updated on: May 14, 2025 | 5:25 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. विशेष म्हणजे पाकिस्तानमधीलच एक राज्य असलेल्या बलुचिस्तानने भारताच्या या कारवाईचं समर्थन केलं होतं, तसेच जेव्हा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला, त्यानंतर बलुच आर्मीकडून देखील पाकिस्तानच्या सैन्य तळांना लक्ष्य बनवण्यात आलं.

पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानवर अन्याय होत असल्याचा आरोप येथील जनतेकडून करण्यात आला आहे, त्यामुळे बलुचिस्तानमधील जनतेकडून आता वेगळ्या बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर बलुच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. बलुच आर्मीने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका ट्रेनचं अपहरण देखील केलं होतं. बलुचिस्तानमधील बंडखोरांकडून सातत्यानं पाकिस्तानी आर्मीवर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत झालेल्या 51 हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्ताननं स्वीकारली आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या नाकीनऊ आणणाऱ्या या बलुच आर्मीकडे 6 हजार लोकांची फौज आहे. वेगळा बलुचीस्तान हीच या लोकांची मागणी आहे. दरम्यान बलुचिस्तान हे पाकिस्तानमध्ये असलेल्याच चार राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानचं एकूण क्षेत्रफळ हे संपूर्ण पाकिस्तानच्या तुलनेत 43 टक्क्यांच्या आसपास आहे, जर समजा बलुचिस्तान पाकिस्तानमधून बाहेर पडलं तर पाकिस्तानचा जवळपास अर्धा भाग कमी होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.