AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी घोषणा झाली. अखेर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची अपेक्षा होती. अखेर युद्धविराम शांतता करार झाला. या युद्धविरामानंतर सर्वात जास्त फायदा भारताचा झाला.

अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात, थेट..
Iran USA war
| Updated on: Jun 15, 2026 | 9:53 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पाकिस्तान आणि कतारने या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून दूर होता. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने या युद्धाचे मोठे परिणाम भारतात बघायला मिळाले. महागाई वाढली. अखेर जगाने सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या युद्धविराम करारात सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो भारत आहे. कारण भारताला असे फायदे मिळणार आहेत जे हा संघर्ष सुरू होण्यापूर्वीही उपलब्ध नव्हते. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातली होती. आता ते सर्व निर्बंध उठवले गेले आहेत, ज्याचा बक्कळ फायदा भारताला होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडी खुली झाली, यासोबतच अमेरिका आपले सैन्य होर्मुजमधून माघारी घेणार आहे. यासोबतच इराणच्या तेलावर असलेले सर्व निर्बंध हटवले जातील.

म्हणजेच इराणच्या तेलावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आता नसणार आहेत. जागतिक बाजारात इराणचे तेल कोणीही खरेदी करू शकते. इराणची अरबो डॉलरची संपत्ती अमेरिकेकडून फ्रीज करण्यात आली. भारत 80 ते 85 टक्के तेल खरेदी करतो. ज्यात सर्वात जास्त खाडी देशांकडून भारत खरेदी करतो. जर इराणी तेल बाजारात आले तर जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे भाव कमी होतील. याचा थेट परिणाम जगासोबतच भारतावरही होईल.

यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तर परकिय चलनावरील दबाव आपोआप कमी होईल. भारत अगोदर इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत होता. मात्र, अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवले. भारतासाठी विशेष बाब म्हणजे भारत आणि इराणमधील व्यापार हा डॉलरमध्ये नाही तर रूपयांमध्ये होतो.

हळूहळू करून इराणवरील निर्बंध हटले तर भारत स्वतामध्ये इराणकडून तेल खरेदी करू शकतो. शिवाय विदेशी मुद्रा वाचवण्यातही मोठे यश मिळेल. याचा थेट परिमाम चाबहार बंदरावर होईल. इराणच्या चाबहार बंदरावर भारताने मोठा पैसा वतला आहे. भारत हा पाकिस्तानला बाजुला करून थेट आशियापर्यंत या बंदराच्या माध्यमातून पोहोचतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी