AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा भारतावर मध्यरात्रीच महाभयंकर हल्ला, मिसाईल डागल्या, पण… मध्यरात्री नेमकं काय घडलं?

पाकिस्तानने भारतावर ऑपरेशन सिंदूरनंतर रात्री मिसाईल आणि ड्रोन हल्ला केला. भारताने एस-400 प्रणाली वापरून हा हल्ला विफल केला. पाकिस्तानने सीमा पार गोळीबारही केला, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या कारवायांना तीव्र प्रतिसाद दिला आहे.

पाकिस्तानचा भारतावर मध्यरात्रीच महाभयंकर हल्ला, मिसाईल डागल्या, पण... मध्यरात्री नेमकं काय घडलं?
missileImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 4:03 PM
Share

India Attack On Pakistan : भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करून पाकला सळो की पळो करून सोडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. भारताच्या या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला असून पाकिस्तानने थेट भारतावरच हल्ला केला आहे. पाकिस्तानने काल रात्री भारतातील 15 सैन्य ठिकाणांना टारगेट केलं होतं. 15 शहरांमध्ये हा हल्ला केला होता. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला आहे. भारताने रशियाच्या एस-400 च्या मदतीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल हवेतच नेस्तानाबूत केल्या आहेत.

सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलने भारतातील 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ़, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सहीत उत्तर आणि पश्चिमी भारतातील अनेक सैन्य तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. भारताने या हल्ल्याला इंटीग्रेटिड काऊंटर यूएएस आणि एअर डिफेन्स सिस्टिमच्या मदतीने निष्क्रिय केलं. या हल्ल्याचे ढिगारे अनेक ठिकाणाहून जमा केले जात आहेत. त्यावरून पाकिस्तानने काल रात्री भारतावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच…

भारतीय सैन्याने सतर्कता दाखवून एस-400 म्हणजे सुदर्शन चक्र एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल उद्ध्वस्त करण्यात आल्या. सकाळी सकाळीच पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोनचा ढिगारा सीमावर्ती परिसरात पाहायाला मिळाले. भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण एस-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमच्या सहाय्याने हा हल्ला परतवून लावण्यात आला आहे, असं सैन्याने म्हटलं आहे.

सीमेपलिकडून गोळीबार

पाकिस्तानने सीमेपलिकडून गोळीबार सुरूच ठेवला आहे. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि कॅलिबर आर्टिलरीचा उपयोग करून पाकिस्तानने विनाकारण गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे 16 निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला आणि पाच मुलींचा समावेश आहे. पाकिस्तानने सीमेपलिकडून भ्याड हल्ला सुरूच ठेवल्याने भारतालाही त्याला जशास तसे उत्तर द्यावं लागलं आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.