AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan War : हल्ला जरुर होणार, हडबडलेल्या पाकिस्तानातून युद्धाच्या दोन नवीन तारखा जाहीर

सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयावर बासित म्हणाले की, "पाण्याशिवाय पाकिस्तानची गुजराण होऊ शकत नाही. पाणी मिळालं नाही, तर आमची आयुष्य धोक्यात येतील. पाणी नाही, तर रक्त वाहिल"

India-Pakistan War : हल्ला जरुर होणार, हडबडलेल्या पाकिस्तानातून युद्धाच्या दोन नवीन तारखा जाहीर
| Updated on: May 06, 2025 | 12:38 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ला ही आपली मोठी चूक आहे, हे पाकिस्तानला कळून चुकलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कसा घेणार? पाकिस्तान याच चिंतेमध्ये आहे. तिथल्या सत्ताधाऱ्यांना, नेत्यांना, माजी सैनिकांना, माजी राजनैतिक अधिकाऱ्यांना सध्या दिवस-रात्र फक्त युद्धाची स्वप्न पडत आहेत. भारत यावेळी कुठल्या बाजूने? कशी कारवाई करणार? हेच पाकिस्तानला समजत नाहीय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये बेताल वक्तव्यांचा पूर आला आहे. तिथली मंडळी सतत अणूबॉम्बचा जप करतच आहेत. पण आता तिथल्या एका जाणकारे माणसाने भारत कधी हल्ला करेल? ती तारीख जाहीर केली आहे. पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी त्यांच्या X अकाऊंटवर भारत कधीपर्यंत कारवाई करणार? ते जाहीर केलय. अब्दुल बासित हे पाकिस्तानचे निवृत्त मुत्सद्दी असून त्यांनी भारतात पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.

“रशियाच्या विजय उत्सवानंतर भारत 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत स्वरुपाची कारवाई करु शकतो” असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे. सध्या अब्दुल बासित यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या स्थितीबद्दल ते सातत्याने मत प्रदर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल बासित म्हणालेले की, “भारत काही ना काही कारवाई करणार, या बद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जाहीर केलेलं की, ते कारवाई जरुर करणार”

‘पाणी नाही, तर रक्त वाहिल’

“भूतकाळात पाहिलं तर 2016 साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारतातील मीडिया, सैन्य अधिकारी आणि संरक्षण एक्सपर्टनुसार भारत हल्ला जरुर करणार” असं अब्दुल बासित म्हणाले होते. “मागच्या काही हल्ल्यांचा पॅटर्न बघितला तर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत 1 ते 3 मे दरम्यान पहिल्या आठवड्यात कारवाई करु शकतो. भारताने अशी कुठली कारवाई केल्यास आम्ही तयार आहोत. पाकिस्तानही जोरदार प्रत्युत्तर देईल” असं अब्दुल बासित म्हणाले होते.

Follow Us
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया