AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय जहाजावरील गोळीबारानंतर सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट इराणच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी खळबळ उडाली. होर्मुज खाडी ठप्प आहे. होर्मुज खाडी सध्याच्या घडीला युद्धाचे मैदान बनले आहे. अनेक देशांचे जहाज होर्मुजमध्ये अडकली आहेत. यादरम्यानच भारताने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

भारतीय जहाजावरील गोळीबारानंतर सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट इराणच्या..
Strait of Hormuz india ship firing
| Updated on: Apr 21, 2026 | 9:19 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात भारताला फटका बसला आहे. 18 एप्रिल रोजी होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर पुन्हा बंदराकडे जहाज परतले. मात्र, भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबारानंतर भारताने मोठा इशारा इराणला दिला. होर्मुज खाडीत भारताचे अजूनही 14 जहाज अडकले आहेत. होर्मुज खाडीत दिवसेंदिवस स्थिती बिघडताना दिसत आहे. आता होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले. होर्मुजमध्ये 14 जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता भारताकडून खास प्लॅन तयार करण्यात आला. होर्मुज खाडीत जहाज ठेवणे म्हणजे मोठा धोका सध्याच्या परिस्थितीला आहे. इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली, त्यामुळे जहाज तिथून काढणे कठीण आहे. हैराण करणारे म्हणजे भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स सैनिकांनी गोळीबार केला.

या घटनेला सरकारने खूप जास्त गंभीर घेतले. भारताने या घटनेनंतर भारतामधील इराणच्या राजदूतांना संपर्क साधून याच्यावर टीका केली. होर्मुज खाडी अडकलेले 14 जहाज सुरक्षित काढण्याकरिता भारताने प्रयत्न वाढवले आहेत. दुसरीकडे नाैसेनेच्या 7 युद्धनाैकांचे एस्कॉर्टही सुरू करण्यात आले. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली 14 जहाज सुरक्षित आणायची आहेत.

भारतीय जहाजावरील गोळीबारीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी इराणी दूत यांची भेट घेतली आणि चिंता व्यक्त केली. होर्मुज खाडीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याच्या मुद्दावर त्यांनी जोर दिला. हेच नाही तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही म्हटले की, होर्मुज जवळील भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी आम्ही सतत इराणी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत आहोत.

भारतीय जहाजांना होर्मुज खाडीत सुरक्षित मार्ग नक्की कसा मिळेल, याकरिता प्रयत्न सुरू आहे. इराणकडून भारतीय जहाजावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर जहाजाचे फार काही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. या गोळीबारानंतर भारतीय जहाज पुन्हा बंदरावर पोहोचले. मात्र, परिस्थिती होर्मुज खाडीत बिकड आहे, हे स्पष्टच आहे. युद्धबंदी शांतता कराराबाबत काही अपडेट मिळत नाही, होर्मुज खाडी पूर्णपणे ठप्प आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल