AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?

मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे.

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 25, 2020 | 12:26 AM
Share

लंडन : मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे. यासाठी ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापारविषयक करारही (Brexit Trade Deal) झाले आहेत. मागील काही वर्षांपासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरु झाली होती, मात्र त्यावर एकमत झालं नव्हत. मात्र, आता अखेर दोन्हीकडील पक्षांनी याला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे यापुढे ब्रिटन युरोपच्या सामाईक बाजाराचा भाग नसेल. या करारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येतेये (Know all about UK EU Brexit trade deal effect on India).

यानंतर आता ब्रिटन (Britain) युरोपच्या सामूहिक बाजाराचा भाग राहणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनमधील सर्व देशांना असणारी एकच कररचना आणि व्यापारविषयक नियम ब्रिटनला लागू होणार नाही. ब्रेग्झिटनंतर अखेर या कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरुप मिळतंय. या कराराला अंतिम रुप देण्यासाठी मागील 10 महिन्यांपासून त्यावर चर्चा सुरु होती. त्यानंतर दोन्ही बाजूने हा करार मान्य करण्यात आला. दुसरीकडे युरोपीयन आयोगाचे (European commission) प्रवक्त्यांनी देखील लवकरच या कराराची माहिती देणार असल्याचं म्हटलं.

ब्रेक्झिट करार काय आहे?

ब्रेक्झिट ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांपासून बनला आहे. या सरळ अर्थ आहे ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. ब्रिटनने जवळपास वर्षभरापूर्वीच युरोपीयन युनियनमधून बाहेर पडच असल्याची घोषणा केली होती. हा निर्णय म्हणजे मागील 5 वर्षांच्या प्रयत्नांचं फळ आहे. 2016 मध्येच ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत जनमत घेण्यात आलं होतं.

ब्रेक्झिटचा भारतावर काय परिणाम होणार?

या कराराचा भारतावरही परिणाम होणार आहे. भारतचा आता स्वतंत्रपणे ब्रिटनशीच व्यापारिक करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार वाढण्यास मदतह होईल.

सायबर सुरक्षा, डिफेन्स आणि फायनान्समध्ये मोठ्या भागिदारीला भारत तयार

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने आता याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारत ब्रिटनला उत्पादन आणि सेवेची ऑफर देऊ शकतो. भारत सायबर सुरक्षा, टेक्नोलॉजी, डिफेन्स आणि आर्थिग क्षेत्रात ब्रिटन आणि भारताची भागीदारी होऊ शकते.

संबंधित बातम्या :

ब्रेक्झिट : संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांचा दारुण पराभव

Know all about UK EU Brexit trade deal effect on India

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ