ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?

मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे.

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 12:26 AM

लंडन : मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे. यासाठी ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापारविषयक करारही (Brexit Trade Deal) झाले आहेत. मागील काही वर्षांपासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरु झाली होती, मात्र त्यावर एकमत झालं नव्हत. मात्र, आता अखेर दोन्हीकडील पक्षांनी याला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे यापुढे ब्रिटन युरोपच्या सामाईक बाजाराचा भाग नसेल. या करारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येतेये (Know all about UK EU Brexit trade deal effect on India).

यानंतर आता ब्रिटन (Britain) युरोपच्या सामूहिक बाजाराचा भाग राहणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनमधील सर्व देशांना असणारी एकच कररचना आणि व्यापारविषयक नियम ब्रिटनला लागू होणार नाही. ब्रेग्झिटनंतर अखेर या कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरुप मिळतंय. या कराराला अंतिम रुप देण्यासाठी मागील 10 महिन्यांपासून त्यावर चर्चा सुरु होती. त्यानंतर दोन्ही बाजूने हा करार मान्य करण्यात आला. दुसरीकडे युरोपीयन आयोगाचे (European commission) प्रवक्त्यांनी देखील लवकरच या कराराची माहिती देणार असल्याचं म्हटलं.

ब्रेक्झिट करार काय आहे?

ब्रेक्झिट ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांपासून बनला आहे. या सरळ अर्थ आहे ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. ब्रिटनने जवळपास वर्षभरापूर्वीच युरोपीयन युनियनमधून बाहेर पडच असल्याची घोषणा केली होती. हा निर्णय म्हणजे मागील 5 वर्षांच्या प्रयत्नांचं फळ आहे. 2016 मध्येच ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत जनमत घेण्यात आलं होतं.

ब्रेक्झिटचा भारतावर काय परिणाम होणार?

या कराराचा भारतावरही परिणाम होणार आहे. भारतचा आता स्वतंत्रपणे ब्रिटनशीच व्यापारिक करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार वाढण्यास मदतह होईल.

सायबर सुरक्षा, डिफेन्स आणि फायनान्समध्ये मोठ्या भागिदारीला भारत तयार

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने आता याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारत ब्रिटनला उत्पादन आणि सेवेची ऑफर देऊ शकतो. भारत सायबर सुरक्षा, टेक्नोलॉजी, डिफेन्स आणि आर्थिग क्षेत्रात ब्रिटन आणि भारताची भागीदारी होऊ शकते.

संबंधित बातम्या :

ब्रेक्झिट : संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांचा दारुण पराभव

Know all about UK EU Brexit trade deal effect on India

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.