AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगानिस्तानमध्ये अजूनही 1600 भारतीय अडकलेले, मदतीसाठी भारताचा प्लॅन काय?

अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. तालिबान्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळचा तालिबान बदलल्याचा दावा केला. तसेच शरिया कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं. मात्र, या तालिबानचा खरा शोषणकारी चेहरा वारंवार समोर येत आहे.

अफगानिस्तानमध्ये अजूनही 1600 भारतीय अडकलेले, मदतीसाठी भारताचा प्लॅन काय?
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 7:23 AM
Share

काबूल : अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. तालिबान्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळचा तालिबान बदलल्याचा दावा केला. तसेच शरिया कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं. मात्र, या तालिबानचा खरा शोषणकारी चेहरा वारंवार समोर येत आहे. अनेक व्हिडीओंमध्ये तालिबानचा सामान्य नागरिकांवरील अत्याचार उघड होतोय. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, अद्यापही 1600 भारतीय तालिबानचं नियंत्रण असलेल्या अफगाणमध्ये अडकलेले आहेत.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालंय. सामान्य नागरिक अफगाणिस्तान सोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काबुल विमानतळावर प्रचंड गर्दी झालीय. लोक मिळेल त्या पद्धतीने इतर देशांमध्ये आसरा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तालिबानकडून गोळीबार होत असल्याचीही माहिती समोर येतेय. त्यामुळे भारतासाठीही ही काळजीची बाब आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये अद्यापही 1600 पेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यांना तेथून सुरक्षित काढण्यासाठी दिल्लीत मिशन काबुलची स्क्रिप्ट तयार केली जातेय. मात्र हे खूप कठीण मिशन असणार आहे.

काबुल एअरपोर्टवरील दृश्ये पाहिली की अंगावर काटा येतो. विमानतळाच्या धावपट्टीवर शेकडो लोक आपला जीव वाचवण्यासाठी विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यात काहींचा मृत्यूही झाला. यावरुनच तालिबान राजवटीची लोकांमधील भितीची कल्पना करता येतेय. म्हणूनच भारताला काबुलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची चिंता लागलीय. यासाठीच भारताकडून प्लॅन तयार केला जातोय.

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल

दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. 17 ऑगस्टला सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन दिल्लात आले.

120 भारतीय परतले

भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून मायदेशी परत आणले गेलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी बोलावण्यात आलं आहे.

जल्लोषात स्वागत

अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी (16 ऑगस्ट) विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उड्डान केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.

अफगाणमधील महिलांच्या स्थितीवरुन जगभरातील 21 देशांनी संयुक्त निवेदन जारी करत काळजी व्यक्त केलीय. यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह 21 देशांचा समावेश आहे. या निवेदनात अफगाणी महिला आणि तरुणींचं शिक्षण, काम आणि प्रवासाचं स्वातंत्र्याच्या अधिकाराबाबत काळजी व्यक्त करण्यात आली. तसेच अफगाणिस्तानमधील सत्ता राबवणाऱ्यांकडे महिलांच्या अधिकारांच्या संरक्षणाची हमी मागण्यात आलीय.

हेही वाचा :

भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा

अफगाणिस्तानवर तालिबानाचा ताबा, सुक्या मेव्याच्या दरांचा भडका, भाववाढीवर ग्राहकांची तीव्र नाराजी, नेमकं काय घडलं?

तालिबानी टेररची थेट हिंदुत्वाशी तुलना, #ArrestSwaraBhasker ट्रेंड करत स्वरा भास्कर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल!

व्हिडीओ पाहा :

More than 1600 Indian people are stuck in Afghanistan amid Taliban attack

Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.