AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video

नेपाळमध्ये, विशेषतः रसुवा जिल्ह्यात, पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पाण्यामुळे भीषण जलप्रलय आला आहे. हवेच्या वेगाने आलेल्या पुरामुळे पूल, टॉवर, इमारती आणि संपूर्ण गावे वाहून गेली आहेत. या अनपेक्षित महापुराने मोठे नुकसान झाले असून, स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं... पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
Nepal floodImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 4:54 PM
Share

कडक्याचं ऊन पडलेलं असताना, पावसाचा एकही थेंब नसताना नेपाळमध्ये जलप्रलय आला. कधीही कुणीही पाहिला नसेल असा महाभयंकर जलप्रलय झालाय. या जलप्रलयाचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतंय. हवेच्या वेगाने पाणी आलं अन् पूल, टॉवर, इमारतीसहीत सर्वच वाहून नेलं. गावच्या गावं वाहून गेली. घरं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. शिल्लक आहे ते फक्त पाणी आणि गाळ. नागरिकांचा आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू. ज्या ज्या ठिकाणाहून पाणी वाहून गेलंय, तिथे फक्त उरल्यात उद्ध्वस्ततेच्या खूणा. या महाभयंकर जलप्रलयाचे असंख्य व्हिडीआ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर कापरे भरल्याशिवाय राहणार नाही, इतकं भीतीदायक दृश्य आहे.

तिबेटने वाट लावली…

तिबेटमधून आलेल्या या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. या जिल्ह्यात संपूर्ण दाणादाण उडाली आहे. हवेचा जेवढा वेग असतो त्या वेगाने नेपाळमध्ये पाणी आलं. येथील लेन्दे खोला (भाटेकोशी नदी)ला एवढा पूर आलाय की नदीचं असं रौद्ररूप पूर्वी कुणी कधीच पाहिलं नसेल. या नदीचं पाणी गावागावात घुसलं. त्यामुळे टिमुरे बाजार आणि रसुवाच्या सीमावर्ती भागात कस्टम विभागाचं मोठं नुकसान झालं आहे. पाण्याबरोबर वाहने आणि इतर सामान काडी कचऱ्यासारखं वाहून गेलं आहे. या महापुरामुळे वस्त्यांचं तर नुकसान झालंच, पण जलविद्यूत परियोजनेलाही मोठा फटका बसला आहे.

सकाळी 9 वाजता काळ आला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता तिबेटमधून अचानक महापूर आला. हा महापूर इतका महाभयानक होता की सर्व सामान वाहून गेलं. घरंदारं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच उरलं नाही, असं स्थानिकांनी म्हटलंय. पाण्याचा फ्लो अचानक वाढल्याने रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि समीपवर्ती स्याफ्रुबेसी परिसरात मोठं नुकसान झालं. पाण्याबरोबर सर्वच साधन संपत्ती गेली. इमारती, पूल आणि टॉवरही वाहून गेल्याचं नेपाळी सैन्याचं म्हणणं आहे.

5 जिल्ह्यांवर हाय संकट

रसुवा जिल्हा हा काठमांडूच्या उत्तर पूर्वेला आहे. या जिल्ह्यापासून तिबेटची सीमा केवळ 125 किलोमीटर दूर आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या एकूण पाच जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना