AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला कोणीही रोखू शकत नाही, अमेरिकेच्या रे डॅलिओ यांनी कोणासोबत केली मोदींची तुलना

Ray Delio on Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात G-20 summit यशस्वीपणे पार पडल्यानंतर अमेरिकेतील गुंतवणूकदार रे डॅलियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलना एका व्यक्तीसोबत केली आहे, ती व्यक्ती कोण आहे. जाणून घ्या.

भारताला कोणीही रोखू शकत नाही, अमेरिकेच्या रे डॅलिओ यांनी कोणासोबत केली मोदींची तुलना
| Updated on: Sep 18, 2023 | 5:27 PM
Share

Narendra Modi : अमेरिकेतील गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी भारताविषयी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता भारताला कोणीही रोखू शकणार नाही. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना चीनचे नेते डेंग शिओपिंग यांच्यासोबत केली आहे. लॉस एंजेलिस येथील यूसीएलए कॅम्पसमधील रॉयस हॉलमध्ये ऑल-इन समिट 2023 मध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा सर्वात उच्च विकासदर असेल

रे डॅलिओ यांनी म्हटले की, “आमच्याकडे भारत आणि जगातील टॉप 20 देशांसाठी 10 वर्षांच्या विकास दराचा अंदाज आहे. भारत उच्च विकास दर कायम ठेवेल अशी शक्यता आहे. माझ्या मते मोदी हे डेंग झियाओपिंग आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि विकास केला आहे.

भारत खूप महत्त्वाचा देश

रे डॅलियो म्हणाले की, “भारत हा खूप महत्त्वाचा आहे. मला वाटत नाही की कोणताही मुद्दा भारताला रोखेल. तटस्थ देश चांगले काम करतात हे आपण इतिहासात पाहिले आहे. त्यांनी युद्धात विजेत्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आज अमेरिकेचा चीन, रशियासोबत संघर्ष आहे. भारतासारखे तटस्थ देश अशा स्थितीचे लाभार्थी असतील.

G-20 मुळे वाढली भारताची प्रतिष्ठा

नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या जी२० संमेलनात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत आशिया खंडातील सर्वात विश्वासू मित्र देश आहे. आशिया खंडात भारताची पकड वाढली आहे. भारताचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांसोबत असलेली बॉन्डिंग देखील जगाने पाहिली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या जी-२० संमेलनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.