AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack : जिथे कधी सेफ होते, त्याच पाकिस्तानात सईद, मसूद अजहरवर पळण्याची, लपण्याची वेळ, काय घडतंय तिथे ?

पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार कडक कारवाई करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने लष्कर प्रमुख हाफिज सईद आणि जैश प्रमुख मसूद अझहर यांना लपवून ठेवले आहे. पंतप्रधान मोदींनी काल बिहारमध्ये बोलताना, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला. दरम्यान, लष्करशी संबंधित TRF नावाच्या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pahalgam Attack : जिथे कधी सेफ होते, त्याच पाकिस्तानात सईद, मसूद अजहरवर पळण्याची, लपण्याची वेळ, काय घडतंय तिथे ?
दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 25, 2025 | 11:15 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून या घटनेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलंय. पाकिस्तानची कोंडी करून त्यांचा नाक दाबण्यासाठी भारताकडून विविध महत्वाची पावलं उचलली गेली आहेत. केंद्राने केलेली कारवाई पाहून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानमध्ये घबराटीटे वातावरण पसरलं आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो, अशी पाकिस्तानला भीती आहे. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या दहशतवादी आकांना लपवण्याचे कामही सुरू केले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवादी सूत्रधार, लष्कर प्रमुख हाफिज सईद आणि दहशतवादी मसूद अझहर यांना लपवत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला हाफिज सईदवर हल्ला होण्याची भीती आहे. ISIने हाफिज सईदला लष्करी छावणीत लपवले आहे. तो अबोटाबादमधील आयएसआयच्या सेफ हाऊसमध्ये दडी मारून बसला आहे. त्याला जराही बाहेर काढण्यात येत नाहीये. पाकिस्तानची सध्या इतकी पाचावर धारण बसली आहे की, 27 एप्रिल रोजी मुरीदके येथे होणारा हाफिजचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. एवढेच नाही तर दहशतवादी मसूद अझहरही हल्ल्याच्या भीतीने भूमिगत झाला आहे. मसूद अझहरला आयएसआयने बहावलपूरमध्ये लपून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींनी काय दिला इशारा ?

या हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचं रक्त खवळलं आहे. हल्लेखोरांवर आणि त्यांच्यामागे असलेल्या कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यानंतर काल पंतप्रधान मोदींनी बिहारमधील सभेत बोलताना थेट इशारा दिला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्यांना थेट इशारा दिला. दहशवाद्यांना जमीनीत गाडलं जाईल, कट रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार असे मोदी म्हणाले. तेव्हापासून पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आहे. ” या हल्ल्यात काहींना आपला मुलगा गमावला. काहींनी आपला भाऊ गमावला. कोणी आपला जीवनसाथी गमावला. त्यातील अनेक जण देशातील वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या सर्वांच्या मृत्यूवर आमचा आक्रोश, दु:ख एक सारखे आहे.. हा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. दहशतवाद्यांच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही. अतिरिक्यांचे नामोनिशान मिटवणार ” असा थेट इशारा मोदींनी कालच्या भाषणात दिला.

हाफिज सईदने केली TRFची स्थापना

दरम्यान, पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी बंदी घातलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटने स्वीकारली आहे. ही संघटना पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LET) ची सहयोगी मानली जाते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील गट लष्करचा एक भाग म्हणून 2019 मध्ये टीआरएफ उदयास आली. काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी ही, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे आयएसआयचे एक साधन असल्याचे बोलले जात आहे. ही संघटना ऑनलाइन नेटवर्कद्वारे तरुणांची भरती करण्यात तसेच खोऱ्यात शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यात सहभागी आहे. हाफिज सईदच्या माध्यमातून आयएसआय या संघटनेचे पालनपोषण करत आहे.

कोण आहे मसूद अजहर ?

तर जैश-ए-मोहम्मद (JeM) चा संस्थापक मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. या दहशतवाद्याने 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला होता आणि 2009 मध्ये झालेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा तो मास्टरमाइंड देखील आहे. 2016 साली झालेल्या मध्ये पठाणकोट हल्ल्याचा आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. त्याने आपल्या दहशतवादाने अनेक निष्पाप लोकांचे जीव घेतले आहेत. याच कारणामुळे तो भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अपहरण झालेल्या इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ (IC८१४) मधील प्रवाशांना वाचवण्याच्या कराराचा एक भाग म्हणून डिसेंबर १९९९ मध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?