AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्ग कोपला! पुरामुळे प्रचंड नुकसान, आतापर्यंत 650 लोकांचा मृत्यू

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 26 जूनपासून पाकिस्तानात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 650 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

निसर्ग कोपला! पुरामुळे प्रचंड नुकसान, आतापर्यंत 650 लोकांचा मृत्यू
pak-floodImage Credit source: tv9 hindi
| Updated on: Aug 17, 2025 | 7:50 PM
Share

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही संपूर्ण देशात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर पाकिस्तानात पुरामुळे 327 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 26 जूनपासून पाकिस्तानात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 650 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पाकिस्तानवरील संकट टळलेलं नाही. हवामान खात्याने 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच देशाच्या वायव्य भागातही पावसाचा कहर पहायला मिळण्याची शक्यता आहे. देशात यंदा सामान्य पेक्षा लवकर पाऊस सुरु झाला आहे. तसेच हा पाऊस आता पुढील दोन आठवड्यांपर्यंत सुरु राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

खैबर पख्तुनख्वामध्ये 327 जणांचा मृत्यू

खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 327 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बुनेरमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पावसामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात 137 लोक जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकांसह गुरे आणि वाहने वाहून गेली आहेत.

देशातील दुर्गम गावांमध्ये भूस्खलन झाले आहे, अनेक लोक या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. त्यामुळे अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या 2 हजार कर्मचारी बचाव कार्य करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बऱ्याच ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.

बचाव कार्यात अडचण

खैबर पख्तूनख्वा बचाव संस्थेचे अधिकारी बिलाल अहमद फैजी यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. रुग्णवाहिकांना बाधित भागात पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. पाकिस्तान आर्मीच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स अर्बन सर्च अँड रेस्क्यू (USAR) टीम बुनेर, शांगला आणि स्वातमध्ये बचाव कार्य करत आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.