AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक घोषणा आणि पाकिस्तान मोठ्या संकटात, भारताच्या त्या निर्णयाने पाकिस्तानात खळबळ, थेट भीकेची…

भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावात आहेत. त्यामध्येच भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. सध्याच्या घडीला पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघाया मिळत आहे.

एक घोषणा आणि पाकिस्तान मोठ्या संकटात, भारताच्या त्या निर्णयाने पाकिस्तानात खळबळ, थेट भीकेची...
India
| Updated on: Feb 04, 2026 | 12:42 PM
Share

भारताने केलेल्या युरोपीय युनियन आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर पाकिस्तानला मोठा झटका बसला. पाकिस्तानच्या तणावात मोठी वाढ झाली. भारताच्या या करारांमुळे पाकिस्तानच्या कॉटन एक्सपोर्टला मोठा हादरला बसू शकतो. हेच नाही तर पाकिस्तानातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वैश्विक बाजारात पाकिस्तानची स्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. भारताने नुकताच मदर ऑफ डिल्सवर सह्या केल्या. हेच नाही तर अमेरिकेनेही भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. कॉटन जिनर्स फोरमचे अध्यक्ष एहसानुल हक यांनी मोठी चेतावणी दिली आहे. सरकारने जर कॉटन उद्योगांबाबत लगेचच निर्णय घेतला नाही तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. पाकिस्तानच्या वैश्विक बाजारावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.

हक यांना चिंता आहे की, युरोपीय संघ आता भारताकडून उत्पादने निर्यात करेल. भारतावरील ड्यूटीने त्यांनी झिरो केली. भारतावरील मुळ टॅरिफ 25 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर अमेरिकेने केला. दंडात्मक 25 टक्के टॅरिफही लवकरच काढला जाईल. पाकिस्तानच्या उत्पादनावर 19 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत असतानाच भारत आणि युरोपीय यूनियन यांच्यात मदर ऑफ ऑल डिल्स करार झाला. यामुळे भारतातून होणारी निर्यात थेट पद्धतीने वाढू शकते.

भारत ज्यापद्धतीने व्यापार करार अनेक देशांसोबत करत आहे आणि अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला, त्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. युरोपीयन युनियनसोबतही थेट करार झाला. या सर्व गोष्टींचा परिणाम पाकिस्तानवर थेट होणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीला भारताची वैश्विक बाजारात स्थिती चांगलीच मजबूत झाली आहे. पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या अनेक गोष्टींवर परिणाम होईल.

युरोपियन युनियन जास्तीत जास्त वस्तू आता भारतातूनच निर्यात करणार याचा थेट फटका पाकिस्तान आणि पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना बसणार हे स्पष्ट आहे. भारताच्या दोन निर्णयाने पाकिस्तानमध्ये सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा तणाव होता. शेवटी अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....