AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली!

India Pakistan War : दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे भारताने आपली सेना युद्धासाठी सज्ज ठेवली आहे. असे असतानाच आता पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी भारतासोबतच्या युद्धाची थेट तारीखच सांगितली आहे.

'पहलगाम'चा बदला घेण्याची वेळ ठरली! 'या' दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली!
india pakistan war pahalgam terror attack
| Updated on: Apr 29, 2025 | 4:39 PM
Share

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहे. दोन्ही देशांचे नेतेमंडळी एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा आम्ही बदला घेऊ असं थेटपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे भारताने आपली सेना युद्धासाठी सज्ज ठेवली आहे. असे असतानाच आता पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी भारतासोबतच्या युद्धाची थेट तारीखच सांगितली आहे.

पाकिस्तानच्या पोकळ धमक्या

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही राजकीय पक्षांनीदेखील आम्ही सरकारसोबत आहोत, सरकारने कठोर निर्णय घ्यावेत अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधूनही पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय म्हणजे युद्ध छेडण्याचीच भाषा आहे, असा थयथयाट पाकिस्तानने केला आहे. भारताने युद्ध छेडलच तर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पाकिस्तानी संरक्षणमंत्री नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी दोन्ही देशांतील युद्धाबाबत भाकित वर्तवलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढच्या चार दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं ख्वाजा असिफ यांनी म्हटलंय. ख्वाजा यांचं हे विधान म्हणजे त्यांनी एका प्रकारे भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाची तारीखच सांगून टाकली आहे, असं बोललं जातंय.

भारताची सेना सज्ज

दरम्यान, पाकिस्तानकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. असे असले तरी पाकिस्तानने कोणतीही कृती केली तर भारतीय सेना त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. भारताचे तिन्ही दल पूर्ण तयारीनिशी सराव करत आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....