AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतारकडून भारतीय नागरिकांची सुटका होताच पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय

PM modi qutar Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तेव्हा आला जेव्हा कतारने आठ भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. आज माजी भारतीय नौसैनिक भारतात परतले आहे. गेल्या १८ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. त्यांना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कतारकडून भारतीय नागरिकांची सुटका होताच पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 12, 2024 | 8:53 PM
Share

PM modi qutar Visit : सोमवारी सकाळी भारतीयांना एक मोठी गुडन्यूज मिळाली. कतारने १८ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताकडून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता होता. पण असं असतानाच काही दिवसांपूर्वी पीएम मोदी आणि कतारचे अमीर यांच्यात भेट झाली होती. या भेटीत देखील हा मुद्दा मांडला गेला होता.

मोदींचा कतार दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मंगवळवारी UAE दौऱ्यावर जाणार आहे. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी दोहा येथे कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीसाठी जाणार आहेत. अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी केलीये. ऑगस्ट 2022 पासून कतारमध्ये सुमारे 18 महिन्यांपासून अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेनंतर भारताच्या राजनैतिक विजयानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा कतार दौरा आहे. याआधी जून 2016 मध्ये त्यांनी कतार दौरा केला होता. भारत आणि कतार यांच्यातील वाढत्या संबंधांवर भर देत परराष्ट्र सचिवांनी कतारमध्ये होत असलेल्या या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटींचा उल्लेख केला.

काही दिवसात भारत आणि कतार यांच्यात व्यापार व्याढला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची दोहा भेट आणि जून 2022 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांत कतारला अनेक भेटी दिल्या आहेत. त्यामुळे कतार आणि भारत यांच्यात संबंध चांगले झाले आहेत.

द्विपक्षीय संबंध सातत्याने वाढत आहेत

भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सध्या अंदाजे USD 20 अब्ज इतका आहे. कतार भारतातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार म्हणून पुढे येत आहे. भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय संबंध सातत्याने वाढत आहेत.

कतार एनर्जी आणि भारताच्या पेट्रोनेट यांच्यात 2028 पासून सुरू होणाऱ्या 20 वर्षांच्या कालावधीसाठी कतारकडून भारताला प्रतिवर्षी 7.5 दशलक्ष मेट्रिक टन एलएनजी पुरवठ्यासाठी अलीकडील कराराचा उल्लेख करताना, क्वात्रा म्हणाले, “नुकत्याच झालेल्या निष्कर्षांनंतर तुम्हाला माहिती असेल. इंडिया एनर्जी वीक, कतार एनर्जी आणि इंडियाज पेट्रोनेट यांनी 2028 पासून 20 वर्षांसाठी कतररकडून भारताला प्रतिवर्षी 7.5 दशलक्ष मेट्रिक टन एलएनजी पुरवण्यासाठी करार केला होता”.

कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ नागरिकांची सोमवारी कतारने सुटका केली. नवी दिल्लीच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलण्यात आली. नंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईतील COP28 शिखर परिषदेच्या बाजूला कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली होती.

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!