AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या मदतीला पुन्हा धावला रशिया, पुतिन यांनी भारतासाठी जगापुढे ठेवली सर्वात मोठी मागणी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला एक महान देश म्हटले आहे. भारताची आर्थिक प्रगती आणि त्याची विशालता लक्षात घेऊन जागतिक महासत्तांच्या यादीत त्याचा समावेश केला पाहिजे असे त्यांनी म्हटलंय. रशियातील सोची शहरातील वालदाई डिस्कशन क्लबमध्ये भाषण करताना पुतिन यांनी या गोष्टी सांगितल्या.

भारताच्या मदतीला पुन्हा धावला रशिया, पुतिन यांनी भारतासाठी जगापुढे ठेवली सर्वात मोठी मागणी
| Updated on: Nov 08, 2024 | 8:04 PM
Share

India-russia : अमेरिकेत ट्रम्प यांचं सरकार येणार असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला एक महान देश असल्याचे म्हटले आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारताचा वेगाने होत असलेला आर्थिक विकास त्यांना जागतिक महासत्ता देशांच्या यादीत समाविष्ट होण्यास पात्र ठरतो. रशियात वालदाई डिस्कशन क्लबमध्ये बोलताना पुतिन यांनी हे विधान केले आहे.

पुतिन यांनी भारताच्या प्रगतीबद्दल कौतुक केले आणि जागतिक क्षेत्रात ते अद्वितीय असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, रशिया भारतासोबत अनेक आघाड्यांवर संबंध मजबूत करत आहे. भारताची दीड अब्ज लोकसंख्या, जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान वाढ, प्राचीन संस्कृती आणि पुढील विकासासाठी चांगली शक्यता असलेल्या महासत्तांच्या यादीत निःसंशयपणे भारताचा समावेश झाला पाहिजे, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

मजबूत द्विपक्षीय संबंधांवर प्रकाश टाकत पुतिन यांनीआपल्या भाषणात सांगितले की, ‘आम्ही भारतासोबत विविध क्षेत्रात आमचे संबंध विकसित करत आहोत. भारत एक महान देश आहे. आर्थिक वाढीच्या बाबतीतही ते प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये प्रमुख आहे. त्याचा जीडीपी ७.४ टक्के दराने वाढत आहे. रशिया आणि भारत यांच्यातील सहकार्य दरवर्षी वाढत आहे.

पुतिन यांनी सोव्हिएत युनियनच्या काळापासून रशियाच्या भारतासोबतच्या संबंधांबद्दल सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध अतिशय खास असल्याचे म्हटले आहे. पुतिन म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यात सोव्हिएत युनियनचीही भूमिका होती. राजनयिक प्रगतीबाबत आशावाद व्यक्त करताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाचीही कबुली दिली. पुतिन पुढे म्हणाले, “जे बुद्धिमान आणि सक्षम लोक त्यांच्या राष्ट्रांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवतात ते तडजोड शोधत असतात आणि शेवटही त्यांना सापडेल. या दृष्टिकोनाला गती मिळत राहिल्यास, तडजोड होऊ शकते.

Follow Us
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....