AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदूंसाठी पुढे आले, बांगलादेश सरकारने देशद्रोहाचे कलम लावले, कोण आहेत चिन्मय कृष्ण दास?

बांगलादेशातील चांदगाव येथील इस्कॉन मंदिराचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदू केवळ रस्त्यावरच उतरले नाहीत, तर बांगलादेशातील कट्टरपंथी टोळ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासही सज्ज झाले आहेत. बांगलादेशातील संतांना एकत्र आणणारे चिन्मय कृष्ण दास हे पहिले आहेत. त्यांनी धर्मसंसदेचे आयोजन केले. दरम्यान, ते का मोहम्मद युनूस सरकारच्या निशाण्यावर आहेत, जाणून घ्या.

हिंदूंसाठी पुढे आले, बांगलादेश सरकारने देशद्रोहाचे कलम लावले, कोण आहेत चिन्मय कृष्ण दास?
Chinmoy Krishna DasImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 8:07 PM
Share

बांगलादेशातील चांदगाव येथील इस्कॉन मंदिराचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्यासह 19 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाच्या एका नेत्याने हा खटला दाखल केला होता. चिन्मय कृष्ण दास यांनी बांगलादेशच्या ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चिन्मय कृष्ण दास यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू केवळ रस्त्यावरच उतरले नाहीत. बांगलादेशातील कट्टरपंथी टोळ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासही सज्ज झाले आहेत.

बांगलादेशात काही दिवसांपूर्वीपर्यंत हिंदू व्यापाऱ्यांना जिझियासारखा कर मागितला जात होता. हिंदूंची मालमत्ता जप्त केली जात होती. आज त्याच बांगलादेशच्या रस्त्यांवर जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहेत. धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्यावरील चुकीच्या आरोपाच्या निषेधार्थ हिंदू समाजबांधव रस्त्यावर उतरले आहेत.

आंदोलनात महिला, लहान मुले सहभागी

हिंदूंकडून सातत्याने निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनात महिला, पुरुष, लहान मुले, युवक सहभागी होत आहेत. महंत चिन्मय कृष्ण दास यांच्या वेशभूषेत ते दाखल झाले आहेत. या कठीण काळात आपण आपल्या धर्मगुरूच्या पाठीशी उभे आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न हे सर्व जण करत आहेत.

चिन्मय कृष्ण दास सरकारच्या निशाण्यावर का?

चिन्मय कृष्ण दास सातत्याने हिंदू समाजाचा आवाज उठवत आहेत. बांगलादेशातील संतांना एकत्र आणणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मसंसदेचे आयोजन केले. तेव्हापासून चिन्मय कृष्ण दास बांगलादेशी हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवत आहेत.

चिन्मय कृष्ण दास यांच्यामुळे हिंदूमध्ये ऐक्य

चिन्मय कृष्ण दास यांच्यामुळे बांगलादेशातही हिंदू एकत्र येऊ लागले. या ऐक्याचे पहिले मोठे चित्र चटगांवमधून आले. 17 ऑक्टोबरला हजारो हिंदू आपल्या हक्कांसाठी जमले होते आणि आता चिन्मय कृष्ण दास यांच्याविरोधात दाखल झालेल्या खटल्याविरोधात हिंदू एकवटले आहेत.

दडपशाहीला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ

महिनाभरापूर्वी एका बैठकीत चिन्मय कृष्ण दास म्हणाले होते की, बांगलादेशातील हिंदूच जगू शकतात. जेव्हा बांगलादेशी हिंदू एकजुटीने उभे राहतील. दडपशाहीला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.

1971 सारखी परिस्थिती पुन्हा?

1971 सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आज बांगलादेशातील हिंदू चिन्मय कृष्ण दास हाच मंत्र घेऊन पुढे जात आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात पाकिस्तानी लष्कर आणि रझाकारांनी हिंदूंना लक्ष्य केले होते. आता मोहम्मद युनूसची मूलतत्त्ववादी व्यवस्थाही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.