अमेरिकेतून तब्बल इतक्या भारतीयांची हकालपट्टी, धक्कादायक आकडेवारी, कोणी…
भारत आणि अमेरिकेतील वाढलेल्या तणावाचा फायदा पाकिस्तान घेताना दिसला. आता पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध दिसून येत आहेत. भारतावरील टॅरिफबद्दल अत्यंत मोठा निर्णय अमेरिकेने घेतला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांना कारभार हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प धक्कादायक निर्णय घेताना दिसले. भारताबद्दलची त्यांची थेट भूमिका बदलली. H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले. ज्यामुळे भारतीयांना अमेरिकेत जाणे कठीण झाले. भारतावर अमेरिकेने फक्त टॅरिफ लादला नाही तर अनेक धमक्याही दिल्या. आता काही महिन्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगले होताना दिसत आहेत. भारतावरील टॅरिफ काही टक्के मागे घेण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. मात्र, H-1B व्हिसातील बदललेल्या नियमात कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही. यासोबतच H-1B व्हिसावर मोठे शुल्क आकारले. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या H-1B व्हिसाधारकांच्या मुलाखती काही महिन्यांकरिता पुढे ढकलण्यात आल्या असून अजूनही त्यांना तारखा देण्यात आल्या नाहीत. H-1B व्हिसासंदर्भातील प्रक्रिया अधिक किचकट करण्यात आली.
व्हिसा संपल्यानंतरही अमेरिकेत राहणाऱ्या लोकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनमध्ये मोठा बदल केला. अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईचा फटका भारतीयांनाही मोठ्या प्रमाणात बसला. डिसेंबर 2025 पर्यंत तब्बल 3 हजार 800 हून अधिक भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हाकलून देण्यात आले.
याबाबतची माहिती संसदेत सादर करण्यात आली. फक्त अमेरिकाच नाही तर साैदी अरेबिया, मलेशिया, अरब अमिराती, थाडलंड, बहरीन, कंबोडिया, कॅनडा,, चीन, युनायडेट किंगडम अशा काही देशांचाही समावेश आहे, ज्या देशातून बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत भारतात पाठवण्यात आले.
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधात मोठी कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. बऱ्याचदा विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करतात. मात्र, यादरम्यान त्यांच्या व्हिसाची मुदत मात्र संपलेली असते. फक्त भारतच नाही तर अनेक देशातील नागरिकांविरोधात अमेरिका कारवाई करत आहे. फस्ट अमेरिका हे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राबवले जात आहे. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यामध्ये भारत आणि चीनमधील लोक सर्वाधिक आहेत. नोकरीला गेल्यानंतर ते बऱ्याचदा तिथे स्थायिकही होतात.
