AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, भारतीय दूतावासाकडून अलर्ट! परिस्थिती आणखी चिघळणार?

युक्रेनमधून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी परत विमानाने आल्याचे आपण पाहतोय. कारण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला आता 5 दिवस झाल्यामुळे तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या अनेक लोकांनी देश सोडला आहे.

भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, भारतीय दूतावासाकडून अलर्ट! परिस्थिती आणखी चिघळणार?
युक्रेनहून भारतात परतत असताना विद्यार्थी Image Credit source: PTI
| Updated on: Mar 01, 2022 | 1:25 PM
Share

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सध्याची परिस्थिता युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे युक्रेनमध्ये वास्तव करीत असलेल्या भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचा सल्ला युक्रेनचे भारतीय दुतावासाने दिले आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती अधिक बिकट होईल असं वाटतंय. कारण आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या अनेक भागात बॉम्ब हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कीव (kiev) राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे अनेकांचे तिथले नागरिक व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत युक्रेन सोडलं असून ते भारतात परतले आहेत. तर अजून काहीजण तिथं अडकले असल्याची माहिती मिळत आहे. भारतासह अनेक देशांचे नागरिक तिथं राहत असून अनेकांनी आत्तापर्यंत देश सोडलाय तर अनेकजण देश सोडण्यासाठी मार्ग शोधत आहेत.

18,000 हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये वास्तव्यास होते

युक्रेनमधून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी परत विमानाने आल्याचे आपण पाहतोय. कारण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला आता 5 दिवस झाल्यामुळे तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या अनेक लोकांनी देश सोडला आहे. युक्रेनच्या अनेक भागात रशियाने आक्रमण केल्याने तिथली परिस्थिती भयान असल्याची व्हिडीओच्या माध्यमातून समजते आहे. युक्रेनमध्ये 18,000 लोक वास्तव करीत असल्याची माहिती टाईम्सने दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत भारतात परलेल्या लोकांची यादी अत्यंत कमी आहे. युक्रेनच्या शेजारी असलेल्या देशात विद्यार्थ्यांना किंवा नोकदारांना बोलावलं जात आहे आणि त्यानंतर तिथून त्यांना भारतात आणण्याच काम भारत सरकार करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये सध्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही परत आणण्याचा प्रयत्न करू असं भारत सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे तिथ किती विद्यार्थी आणि नोकर अडकले आहेत हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

1568 जण युक्रेनमधून आत्तापर्यंत परतले

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तिथं शिक्षणासाठी असलेल्या अनेक भारतीयांनी युक्रेन सोडलं असून ते तिथल्या शेजारच्या देशात जाऊन भारतात परतले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाने जमा केली आहे त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे समजते. 18 हजार लोकांपैकी आत्तापर्यंत 1568 लोकांना भारतात आणण्यातं सरकारला यश मिळालं आहे. आजचा युद्धाचा 5 वा दिवस असून त्यांनी आत्तापर्यंत रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या स्थळांवरती बॉम्ब हल्ला केला असल्याने तिथली परिस्थिती चिघळली असल्याचं समजतंय. आज सकाळी 182 विद्यार्थी विमानाने परतले आहेत. तसेच कीव शहर सोडण्याचं फर्मान निघाल्याने तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Russia Ukraine War Live : भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान, रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

Video : गाड्यांच्या हालचालीत रस्त्याच्या मधोमध खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! थरकाप उडवणारी दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद

तर उद्धव ठाकरेंना शंभर टक्के पाठिंबा देऊ; आशिष शेलार यांच्याकडून मलिकांच्या हकालपट्टीची मागणी

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.