AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : आमच्यावर युद्ध…AIR STRIKE नंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य

Pakistan Pm shahbaz sharif Operation Sindoor : भारताने मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाइल हल्ला केला. 9 दहशतवादी तळ उडवून दिले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. थेट युद्धाची भाषा त्यांनी केली आहे.

Operation Sindoor : आमच्यावर युद्ध...AIR STRIKE नंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 07, 2025 | 9:32 AM
Share

भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शहबाज शरीफ यांनी X वर एक पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले. युद्ध लादणाऱ्या या कृतीच ठोस प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि हे उत्तर दिलं जातय. पाकिस्तानी सैन्य आणि जनता एकजूट आहे. संपूर्ण देशाच मनोबल उंचावलेलं आहे” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. “शत्रू राष्ट्राचा सामना कसा करायचा ते पाकिस्तानी सैन्याला माहित आहे. आम्ही कधी त्यांचे नापाक इरादे यशस्वी होऊ देणार नाही” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. मुरीदके, बहावलपूर येथील नागरिकांना लक्ष्य केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. महिला, मुलांसह नागरिक शहीद झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे. भारताच्या या आक्रमक कृतीमुळे व्यावसायिक हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे.

“आम्ही भारताच्या या कारवाईचा निषेध करतो. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय नियमांच उल्लंघन केलं आहे” असं पाकिस्तानी पीएमच म्हणणं आहे. भारताच्या या कृतीमुळे दोन अणवस्त्र संपन्न देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे असा पाकिस्तानचा दावा आहे. आम्ही आमची वेळ आणि ठिकाण ठरवून या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ असं पाकिस्तानच म्हणणं आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?

“पाकिस्तान पूर्ण क्षमतेने या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. हे कर्ज तसच फेडू, जसं फेडलं पाहिजे” असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. “त्यांनी दहशतवादी तळं किंवा नागरिकांना लक्ष्य केलय ते आंतरराष्ट्रीय मीडिया जाऊन पाहू शकते” असं ख्वाजा असिफ म्हणाले. या कारवाईनंतर पाकिस्तानने 48 तासांसाठी आपल्या हवाई क्षेत्रातील सर्व वाहतूक बंद केली आहे. भारताने या कारवाईद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगित असे निर्णय घेऊन पाकिस्तानला आधीच दणका दिला होता.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.