AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईच्या वाळवंटात पूर येण्यामागचं कारण काय? लोकांचे का झाले हाल

दुबई सारख्या स्मार्ट सिटीमध्ये पूर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. जगभरातून लोकं दुबईला फिरायला येत असतात. पण या वाळवंट प्रदेशात एका दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे चांगलेच हाल झाले. गाड्या पाण्याखाली गेल्या. वाहतूक बंद झाला आणि विमानतळ देखील बंद करावा लागले होते.

दुबईच्या वाळवंटात पूर येण्यामागचं कारण काय? लोकांचे का झाले हाल
dubai flood
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 20, 2024 | 4:41 PM
Share

दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोलमडली. संपूर्ण शहरात पाणीच पाणी होते. लोक घरातच अडकून पडले होते एवढेच नाही तर दुबईहून दिल्लीला आणि इतर ठिकाणी जाणारी अनेक उड्डाणे देखील रद्द करावी लागली. कारण विमानतळावर ह पाणीच पाणी होते. UAE मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत दुबईला किंवा यूएईच्या इतर शहरांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

75 वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस

मंगळवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे दुबई आणि आजुबाजुच्या परिसरात पूर आला होता. यातून सावरण्याचा लोकं प्रयत्न करत होते. कारण असं चित्र अनेकांना पहिल्यांदाच पाहिलं होतं. शुक्रवारी जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये, दूतावासाने सांगितले की अधिकारी कामकाज सामान्य करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. प्रवाशांनी उड्डाणांच्या वेळेबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून खात्री करून घेतल्यानंतरच विमानतळावर यावे, असा सल्ला विमानतळ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी पाणीच पाणी

दूतावासाने सांगितले की, ‘या आठवड्याच्या सुरुवातीला यूएईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता. परिस्थिती लक्षात घेता, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणाऱ्या फ्लाइट्सची संख्या तात्पुरती मर्यादित केली गेली आहे.जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तासांत पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना येथे प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने असेही म्हटले आहे की तेथे राहणारे भारतीय हवामानाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीसाठी +971501205172, +971569950590, +971507347676 आणि +971585754213 यांच्याशी संपर्क साधू शकतात.

यूएईमध्ये का आला पूर?

दुबई किंवा आसपासच्या शहरांमध्ये खूप कमी पाऊस पडतो. त्यामुळे येथे जास्त पाऊस पडण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे क्लाउड सीडिंग. याद्वारे ढगांमध्ये एक प्रकारचे बीज टाकून पाऊस पाडला जातो.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ढगांमध्ये पावसाच्या बिया पेरण्याच्या प्रक्रियेला क्लाउड सीडिंग म्हटले जाते. हे विमानाच्या मदतीने ढगांमध्ये फवारले जाते. ज्यामुळे पाऊस पडतो. हे तंत्रज्ञान UAE मधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वापरले जाते. रविवार आणि सोमवारसाठी क्लाउड सीडिंगचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतरच दुसऱ्या दिवशी मंगळवारी इतका पाऊस झाला की पूर आला.

Follow Us
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा