AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील टॉप स्मार्ट सिटींची यादी जाहीर, भारताच्या शहरांची रँकिंग पाहून तुम्ही थक्क व्हाल!

IMD ने जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक स्मार्ट शहरांच्या यादीत स्वित्झर्लंडमधील झ्युरिक अव्वल आहे. पण जगात खऱ्या अर्थाने कोणती शहरं 'स्मार्ट' आहेत? आणि या जागतिक स्पर्धेत आपली दिल्ली, मुंबई, बंगळूरु सारखे शहरं कुठे आहेत? चला पाहूया.

जगातील टॉप स्मार्ट सिटींची यादी जाहीर, भारताच्या शहरांची रँकिंग पाहून तुम्ही थक्क व्हाल!
imd smart city indexImage Credit source: Tv9 Bharatvarsh
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 3:49 PM
Share

‘स्मार्ट सिटी’ हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक आलिशान आणि आधुनिक शहर उभं राहतं. ज्यात असतील, चकचकीत रस्ते, सहज वाहतूक व्यवस्था, जलद इंटरनेट, टेक्नॉलॉजीच्या मदतीने सोपी झालेली जीवनशैली आणि स्वच्छतेसह नागरिकांसाठी असलेल्या सगळ्या आधुनिक सोयी. पण प्रत्यक्षात, जगभरात अशा स्मार्ट सिटींचं खरं चित्र काय आहे आणि भारत त्या यादीत कुठे आहे, हे जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे.

इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनं २०२४ साठी ‘स्मार्ट सिटी इंडेक्स’ जाहीर केला आहे. या यादीमध्ये एकूण १४२ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शहरांमध्ये टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर, सार्वजनिक सोयी-सुविधांची उपलब्धता आणि नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता यावर भर देऊन मूल्यांकन केलं जातं.

या यादीत जगातील अव्वल शहर ठरलं आहे झ्युरिक (Zurich) — स्वित्झर्लंडमधील हे शहर आधुनिक सोयी, तंत्रज्ञान आणि उत्तम व्यवस्थापनामुळे पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. दुसऱ्या स्थानावर नॉर्वेची राजधानी ओस्लो (Oslo) आहे तर तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा (Canberra) आहे. आशियातील एकमेव शहर सिंगापूर (Singapore) यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

मात्र, भारतासाठी ही यादी फारसं आनंददायक चित्र उभं करत नाही. भारतातील केवळ चार शहरांना या जागतिक यादीत स्थान मिळालं आणि त्यापैकी एकही शहर टॉप १०० मध्ये पोहोचू शकलेलं नाही.

भारतातील शहरांची रँकिंग खालीलप्रमाणे:

  • दिल्ली – १०६ वा क्रमांक
  • मुंबई – १०७ वा क्रमांक
  • बंगळुरु – १०९ वा क्रमांक
  • हैदराबाद – १११ वा क्रमांक

ही यादी स्पष्ट सांगते की भारत अजूनही स्मार्ट सिटी बनण्याच्या प्रवासात बराच मागे आहे. शहरात जास्त चांगल्या सुविधा, सार्वजनिक वाहतुकीचं नियोजन, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आणि नागरिकांच्या जीवनशैलीत बदल घडवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाला आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

स्मार्ट सिटी म्हणजे फक्त नावाला नव्हे तर तंत्रज्ञानाने सुलभ झालेलं, सुरक्षित आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून उभं राहिलेलं शहर हे लक्षात घेणं आता वेळेची गरज बनली आहे!

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प