AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणता देश आहे जेथे अजूनही ATM नाही, फोन करण्यासाठी लोक वापरतात टेलिफोन बुथ

No ATM country : जगातील असा देश जेथे एटीएम सर्विस तर सोडाच मोबाईल फोन देखील खूप कमी लोकांकडे आहे. मोबाईल असला तरी त्याच इंटरनेट डेटा मिळत नाही. खात्यातून पैसै काढण्यावरही निर्बंध. लोकांना देशाच्या बाहेर ही पडता येत नाही. कारण सरकार व्हिजाच देत नाही.

कोणता देश आहे जेथे अजूनही ATM नाही, फोन करण्यासाठी लोक वापरतात टेलिफोन बुथ
earth
| Updated on: Nov 09, 2023 | 2:18 PM
Share

No ATM Country : भारतात आता जागोजागी एटीएमची सेवा मिळते. असं कोणतंही शहर नाही जेथे एटीएमचे जाळे पसरलेले नाही. अनेक देशांमध्ये आता एटीएम ही सामान्य सेवा झाली आहे. तसा एटीएमचा वापर ही कमी होत चालला आहे. कारण आता लोकांचा कल डिजीटल पेमेंटवर आहे. कोणत्याही दुकानावर गेले की व्यक्ती फोन काढतो आणि यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करुन टाकतो. पण तुम्हाला माहितीये का या जगात असाही एक देश आहे जेथे अजून एटीएमची सेवा देखील नागरिकांना मिळालेली नाही. इतकंच नाही तर अनेक नागरिकांकडे अजून मोबाईल फोन देखील नाही. ज्यामुळे लोकांना फोन करण्यासाठी अजूनही  पीसीओ बूथवर जावे लागते.

आम्ही ज्या देशाबद्दस बोलत आहेत त्या देशाचं नाव आहे इरिट्रीया. हा देश आफ्रिका खंडात आहे. भारतात आता लोकांची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण या देशात लोकांना एका महिन्यात फक्त 23,500 रुपयेच त्यांच्या खात्यातून काढता येतात. जर लग्नासारखा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर काही सूट दिली जाते. पण त्यावरही मर्यादा आहेत

मोबाईल वापरणे ही कठीण

एरिट्रियामध्ये एरिटेल नावाची टेलिकॉम कंपनी आहे. पण या कंपनीवर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण आहे. मोबाईल फोनसाठी जर सिम घ्यायचे असेल तर ते देखील अवघडच. सिम घेण्यासाठी देखील स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. सिम घेतले तरी सिममध्ये मोबाइल डेटा नसल्यामुळे त्यावर इंटरनेट देखील वापरू शकत नाही.

पर्यटकांना तात्पुरते सिम घ्यायचे असल्यास त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो. त्यानंतर 3-4 दिवसात त्यांना सिम मिळते. येथे लोकांना फक्त वायफायवर नेट वापरता येते. पण इंटरनेट देखील खूपच स्लो आहे. इरिट्रियाच्या लोकसंख्येपैकी फक्त एक टक्के लोक इंटरनेट वापरतात.

टीव्ही पाहण्यावरही निर्बंध

एरिट्रियन नागरिकांना फक्त तेच पाहता येथे जे येथील सरकारला दाखवायचे असते. इथल्या माध्यमांना स्वतंत्रपणे काहीही लिहिण्याचा अधिकार नाही. सरकारवर टीका करणाऱ्यांना येथे तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

लष्करी प्रशिक्षण घेणे बंधनकारक

लष्करी सेवा पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत येथील लोकांना पासपोर्टही मिळत नाही. पासपोर्ट मिळाल्यानंतर देश सोडणे ही सोपे नाही. कारण सरकार सहजासहजी व्हिसा देत नाही. कारण सरकारला भीती आहे की लोकं देशात परत येणार नाही. अशा प्रकारे येथील लोकांना अनेक समस्यांसह जगावे लागते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत कमेंट करुन नक्की कळवा.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.