AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk | सकाळ की रात्र, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या…

आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध (Milk) पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बर्‍याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते.

Milk | सकाळ की रात्र, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या...
दूध
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jun 19, 2021 | 10:21 AM
Share

मुंबई : आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध (Milk) पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बर्‍याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. त्याच वेळी, यामध्ये देखील दुमत असते की, कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे? याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की, सकाळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, तर बरेच लोक रात्री दूध सेवन करणे अधिक योग्य मानतात (Morning or Night know which time is best to drink milk).

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? आपण कोणत्या वेळी दूध प्यावे? आणि आपल्या शरीरासाठी दूध कसे फायदेशीर आहे?, हे देखील जाणून घेऊया…

दुधाचे फायदे काय?

दूध हे जरी एक पेय असले, तरी दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते. दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे ए, बी 1, बी 2, बी 12 आणि डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटक असतात. या कारणास्तव, ते एक संपूर्ण अन्न मानले जाते. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे.

दूध पिण्याची योग्य वेळ?

आयुर्वेदानुसार, दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री. असे म्हणतात की, रात्री झोपण्यापूर्वी एखाद ग्लास दूध प्यावे. तसेच, असेही म्हटले जाते की दुधामुळे कोणतीही अॅलर्जी होत नसून, इतर सर्व लोकांनी दूध प्यावे. तसेच, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्याल, तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळेल. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही रात्री दूध पीता, तेव्हा तुम्हाला कॅल्शियमचे अधिक फायदे मिळतात. कारण, रात्रीच्या वेळी तुमची क्रिया पातळी कमी असते.

त्याचबरोबर, सकाळच्या वेळात दूध पिणे देखील बर्‍याच प्रकारे फायदेशीर आहे, कारण ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असते, त्यांना रात्री दूध पचवणे अवघड होते. यासह घरात जर 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असतील, तर दिवसा दूध पिणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, रात्री दूध पिणे अधिक योग्य मानले जाते.

(Morning or Night know which time is best to drink milk)

हेही वाचा :

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

आधार कार्ड वेरिफाय कसं करायचं? क्यूआर कोड वेरिफिकेशन म्हणजे काय? वाचा सविस्तर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली