Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये किसान विकास पत्राचाही समावेश आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात

Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:52 PM

येत्या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणूक योजनांमध्ये  तुम्ही गुंतवणूक करू शकता. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Small Savings Scheme) तुम्हाला हमखास परताव्याची संधी मिळते. तसेच या गुंतवणुकीवर कसली ही जोखीम नाही. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी (Return) या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. बँक दिवाळखोरीत गेली तर ग्राहकाला किती ही गुंतवणूक केली असली तरी केवळ 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. पोस्ट खात्यात दिवाळखोरीचा कोणताच विषय नसल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. किसान विकास पत्र योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत वार्षिक 6.9 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम 14 महिन्यांत म्हणजे 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतील.

गुंतवणुकीची रक्कम

किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्हाला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

खाते कोण उघडू शकेल?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक प्रौढ आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.

कालावधी

या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करणे

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

Black pepper काळ्या मिऱ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!” parineeti chopra: शेतात पिकवलेल्या भाज्यांचे फोटो टाकत परिणीता चोप्राने केले वडिलांचे कौतुक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.