AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणं

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ दबावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारताला देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सोडलं नाही. सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यात वाढ केली आणि 50 टक्के केला. पण टॅरिफ म्हणजे काय? समजून घ्या सोप्या शब्दात

टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणं
टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणंImage Credit source: PTI
| Updated on: Aug 07, 2025 | 5:07 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफचा बडगा उचलला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतावर देखील ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावला. मात्र यावरही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यात वाढ केली. त्यांनी टॅरिफ आता 50 टक्के लादला आहे. त्यामुळे देशभरात या निर्णयामुळे काय परिणाम होतील याची चर्चा सुरु झाली आहे. भारताने त्यांच्या हुकूमशाही टॅरिफचा विरोध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा निर्णय अन्यायकारक आणि अविवेकी असल्याचं भारताने सांगितलं आहे. असं सर्व घडत असताना हा टॅरिफ म्हणजे नेमकं आहे तरी काय? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर सोप्या भाषेत त्याबाबत समजून घ्या.

टॅरिफ म्हणजे नेमकं काय?

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. म्हणजेच अमेरिकन बाजारात उपलब्ध असलेली सर्व भारतीय उत्पादनं आता अधिक महाग होतील. उदाहरणार्थ, भारतात एखाद्या वस्तुची किंमत ही 100 रुपये आहे. तीच वस्तू तुम्हाला अमेरिकेत जाऊन विकायची असेल तर त्यावर 50 टक्के कर भरावा लागेल. म्हणजेच त्या वस्तूच्या माध्यमातून अमेरिकेच्या खात्यात 50 रुपये जातील. म्हणजेच त्या वस्तूची किंमत 150 रुपये होईल. या निर्णयामुळे वस्तूंची किंमत वाढले आणि मागणीत घट होईल. त्यामुळे कर भरूनही उत्पादनं बाजारात टिकून राहणार नाहीत. त्या तुलनेत अमेरिकने उत्पादनं ही स्वस्त असतील.

देश टॅरिफ का लादतात? त्याचं कारण काय?

टॅरिफ लादण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत कंपन्या त्या किंमतीत उत्पादन तयार करू शकत नाही. त्यामुळे टॅरिफ लादून विदेशी माल महाग केला जातो. त्यामुळे लोकांचा कल स्वदेशी माल खरेदीकडे जातो. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळते. उद्योग धंदे बंद होत नाही. नोकऱ्यांचं प्रमाण वाढतं. सरकार उद्योगासोबत रोजगारही सुरक्षित करतात.

दुसरं कारण म्हणजे देशातील व्यवसायिक तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. काही देश निर्यातीच्या तुलनेत आयात मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्याचा समतोल राखण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. तिसरं म्हणजे, यामागे राजकीय गणितं असतात. शत्रूराष्ट्रांना आर्थिक अडचणीत आणण्यासाठी टॅरिफ लावला जातो. चौथं म्हणजे देशाची तिजोरी भरण्यासाठी टॅरिफ लावला जातो. या माध्यमातून मोठा निधी उभारला जातो आणि देशाचा गाडा हाकण्यास या पैशांची मदत होते. पाचवं म्हणजे टॅरिफमुळे दर्जेदार उत्पादनं बाजारात टिकतात. तसेच खराब उत्पादनं बाजारात येत नाहीत. म्हणजेच टॅरिफ एका फिल्टरसारखं कामं करतं.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.