AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणं

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ दबावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारताला देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सोडलं नाही. सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यात वाढ केली आणि 50 टक्के केला. पण टॅरिफ म्हणजे काय? समजून घ्या सोप्या शब्दात

टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणं
टॅरिफ म्हणजे नेमकं काय? जगभरातील देशांना याची गरज का? जाणून घ्या पाच कारणंImage Credit source: PTI
| Updated on: Aug 07, 2025 | 5:07 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफचा बडगा उचलला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतावर देखील ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावला. मात्र यावरही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यात वाढ केली. त्यांनी टॅरिफ आता 50 टक्के लादला आहे. त्यामुळे देशभरात या निर्णयामुळे काय परिणाम होतील याची चर्चा सुरु झाली आहे. भारताने त्यांच्या हुकूमशाही टॅरिफचा विरोध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा निर्णय अन्यायकारक आणि अविवेकी असल्याचं भारताने सांगितलं आहे. असं सर्व घडत असताना हा टॅरिफ म्हणजे नेमकं आहे तरी काय? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर सोप्या भाषेत त्याबाबत समजून घ्या.

टॅरिफ म्हणजे नेमकं काय?

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. म्हणजेच अमेरिकन बाजारात उपलब्ध असलेली सर्व भारतीय उत्पादनं आता अधिक महाग होतील. उदाहरणार्थ, भारतात एखाद्या वस्तुची किंमत ही 100 रुपये आहे. तीच वस्तू तुम्हाला अमेरिकेत जाऊन विकायची असेल तर त्यावर 50 टक्के कर भरावा लागेल. म्हणजेच त्या वस्तूच्या माध्यमातून अमेरिकेच्या खात्यात 50 रुपये जातील. म्हणजेच त्या वस्तूची किंमत 150 रुपये होईल. या निर्णयामुळे वस्तूंची किंमत वाढले आणि मागणीत घट होईल. त्यामुळे कर भरूनही उत्पादनं बाजारात टिकून राहणार नाहीत. त्या तुलनेत अमेरिकने उत्पादनं ही स्वस्त असतील.

देश टॅरिफ का लादतात? त्याचं कारण काय?

टॅरिफ लादण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत कंपन्या त्या किंमतीत उत्पादन तयार करू शकत नाही. त्यामुळे टॅरिफ लादून विदेशी माल महाग केला जातो. त्यामुळे लोकांचा कल स्वदेशी माल खरेदीकडे जातो. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळते. उद्योग धंदे बंद होत नाही. नोकऱ्यांचं प्रमाण वाढतं. सरकार उद्योगासोबत रोजगारही सुरक्षित करतात.

दुसरं कारण म्हणजे देशातील व्यवसायिक तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. काही देश निर्यातीच्या तुलनेत आयात मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्याचा समतोल राखण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. तिसरं म्हणजे, यामागे राजकीय गणितं असतात. शत्रूराष्ट्रांना आर्थिक अडचणीत आणण्यासाठी टॅरिफ लावला जातो. चौथं म्हणजे देशाची तिजोरी भरण्यासाठी टॅरिफ लावला जातो. या माध्यमातून मोठा निधी उभारला जातो आणि देशाचा गाडा हाकण्यास या पैशांची मदत होते. पाचवं म्हणजे टॅरिफमुळे दर्जेदार उत्पादनं बाजारात टिकतात. तसेच खराब उत्पादनं बाजारात येत नाहीत. म्हणजेच टॅरिफ एका फिल्टरसारखं कामं करतं.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!