AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो, खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून….

भारतातील एक असं राज्य जिथे लग्न करताना बघायला मिळते एक अनोखी परंपरा. या राज्यात लग्नाचा सर्व खर्च मुलाला करावा लागतो. कोणतं आहे ते राज्य?

एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो,  खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून....
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 13, 2026 | 7:35 PM
Share

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या घटना बघायला मिळतात. अशीच एक हटके परंपरा असणारी विवाहपद्धत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जी छत्तीसगडमधील आहे. छत्तीसगड हे राज्य आपल्या समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि आदिवासी जीवनशैलीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे विविध जनजातीय समुदाय आजही आपल्या पारंपरिक रितीरिवाजांचे जतन करताना दिसतात. अशाच अनोख्या परंपरांपैकी एक म्हणजे ‘उठवा बिहाव’, जी विशेषतः कवर्धा जिल्ह्यातील नेऊर परिसरात राहणाऱ्या बैगा आदिवासी समुदायमध्ये प्रचलित आहे.

ही परंपरा केवळ एक विवाहपद्धती नसून सामाजिक एकता, परस्पर सहकार्य आणि मानवी संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण मानली जाते. आधुनिक काळातही ही प्रथा टिकून आहे.

उठवा बिहाव म्हणजे काय?

‘उठवा बिहाव’ ही एक विशेष विवाहपद्धती आहे, ज्यामध्ये जर वधूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि त्यांना विवाहाचा खर्च उचलणे शक्य नसेल तर वरपक्ष संपूर्ण विवाहसोहळ्याची जबाबदारी स्वतः घेतो. यामुळे आर्थिक अडचणींमुळे विवाहात अडथळा येत नाही.

या परंपरेनुसार, वर आपल्या कुटुंबीयांसह आणि बारातींसह वधूच्या घरी पोहोचतो. तेथे पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत केले जाते. हलदीसारख्या विधी पार पाडल्या जातात, पाहुण्यांना जेवण दिले जाते आणि त्यानंतर वधूची विदाई केली जाते. पुढील विवाहविधी वराच्या घरी पार पडतात.

सामाजिक संदेश आणि महत्त्व

विशेषज्ञांच्या मते, ‘उठवा बिहाव’ ही केवळ एक रीत नाही तर समाजातील परस्पर सहकार्याची भावना दर्शवणारी परंपरा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींनाही सन्मानाने विवाह करण्याची संधी या प्रथेमुळे मिळते.

ही परंपरा दहेजप्रथा, अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाच्या विरोधात एक सकारात्मक संदेश देते. ती सांगते की विवाहासारख्या पवित्र बंधनासाठी आर्थिक स्थिती कधीही अडथळा ठरू नये.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या वनक्षेत्रात प्रचलित असलेली ‘उठवा बिहाव’ परंपरा आजच्या समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. बदलत्या काळातही अशा परंपरा जपल्या जात आहेत, ही बाब समाजातील मानवी मूल्ये अजूनही जिवंत असल्याचे दर्शवते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...