AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो, खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून….

भारतातील एक असं राज्य जिथे लग्न करताना बघायला मिळते एक अनोखी परंपरा. या राज्यात लग्नाचा सर्व खर्च मुलाला करावा लागतो. कोणतं आहे ते राज्य?

एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो,  खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून....
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 13, 2026 | 7:35 PM
Share

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या घटना बघायला मिळतात. अशीच एक हटके परंपरा असणारी विवाहपद्धत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जी छत्तीसगडमधील आहे. छत्तीसगड हे राज्य आपल्या समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि आदिवासी जीवनशैलीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे विविध जनजातीय समुदाय आजही आपल्या पारंपरिक रितीरिवाजांचे जतन करताना दिसतात. अशाच अनोख्या परंपरांपैकी एक म्हणजे ‘उठवा बिहाव’, जी विशेषतः कवर्धा जिल्ह्यातील नेऊर परिसरात राहणाऱ्या बैगा आदिवासी समुदायमध्ये प्रचलित आहे.

ही परंपरा केवळ एक विवाहपद्धती नसून सामाजिक एकता, परस्पर सहकार्य आणि मानवी संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण मानली जाते. आधुनिक काळातही ही प्रथा टिकून आहे.

उठवा बिहाव म्हणजे काय?

‘उठवा बिहाव’ ही एक विशेष विवाहपद्धती आहे, ज्यामध्ये जर वधूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि त्यांना विवाहाचा खर्च उचलणे शक्य नसेल तर वरपक्ष संपूर्ण विवाहसोहळ्याची जबाबदारी स्वतः घेतो. यामुळे आर्थिक अडचणींमुळे विवाहात अडथळा येत नाही.

या परंपरेनुसार, वर आपल्या कुटुंबीयांसह आणि बारातींसह वधूच्या घरी पोहोचतो. तेथे पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत केले जाते. हलदीसारख्या विधी पार पाडल्या जातात, पाहुण्यांना जेवण दिले जाते आणि त्यानंतर वधूची विदाई केली जाते. पुढील विवाहविधी वराच्या घरी पार पडतात.

सामाजिक संदेश आणि महत्त्व

विशेषज्ञांच्या मते, ‘उठवा बिहाव’ ही केवळ एक रीत नाही तर समाजातील परस्पर सहकार्याची भावना दर्शवणारी परंपरा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींनाही सन्मानाने विवाह करण्याची संधी या प्रथेमुळे मिळते.

ही परंपरा दहेजप्रथा, अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाच्या विरोधात एक सकारात्मक संदेश देते. ती सांगते की विवाहासारख्या पवित्र बंधनासाठी आर्थिक स्थिती कधीही अडथळा ठरू नये.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या वनक्षेत्रात प्रचलित असलेली ‘उठवा बिहाव’ परंपरा आजच्या समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. बदलत्या काळातही अशा परंपरा जपल्या जात आहेत, ही बाब समाजातील मानवी मूल्ये अजूनही जिवंत असल्याचे दर्शवते.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या