AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुघलांचे वंशज सध्या भारतात कुठे राहतात आणि काय करतात? जाणून घ्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमामुळे सध्या सगळीकडे मुघलांची चर्चा सुरु आहे. मुघलांचे वंशज भारतात कुठे राहतात आणि काय करतात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

मुघलांचे वंशज सध्या भारतात कुठे राहतात आणि काय करतात? जाणून घ्या
descendants of the MughalsImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2025 | 1:44 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसला होता. या चित्रपटानंतर अनेकांना औरंगजेबाचे वंशज भारतात आहेत का? ते कुठे राहतात? काय करतात असे अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊया औरंगजेबाच्या वंशजांविषयी…

जेव्हा भारतातील मुघलांचे साम्राज संपले तेव्हा त्यांच्या वंशजांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी सर्वसामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांच्या भीतीमुळे त्यांना आपल्या जीवची काळजी वाटू लागली होती. आज, भारतातील विविध शहरांमध्ये अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे ते जीवन व्यतीत करत आहेत.

भारतात सध्या मुघलांचे दोन वंशज राहत आहेत. भारतातील सर्वात शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर यांच्या पणती सुलताना बेगम या आजही भारतात आहेत. त्या ६० वर्षांच्या आहेत. सुलताना या शाही घराण्यातील असूनही आज अगदी गरिबीत जीवन जगत आहेत. त्या कोलकाता जवळील एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. त्यांना उदर्निवाह करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना मूलभूत पेन्शवर उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी हा शेवटचा मुघल सम्राट. ते बहादूर शाह जफरच्या घराण्यातील सहाव्या पिढीतील स्वयंघोषित वंशज आहे. ते मुघलांचे कायदेशीर वंशज मानले जातात. तसेच अमीर तैमूरचे २३वे वंशज आणि झगहीरुद्दीन मोहम्मद बाबरचे १८ वे वशंज म्हणून राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी ओळखले जातात. ते एक मोठे व्यावसायिक आहेत. ते हैदराबादमधील कांचनबाग डिफेन्स परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. त्यांना पाच मुले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर भारतातील मुघलांचे वंशज हे संपत आले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.