AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या काही ठिकाणांना एक्सप्लोर करण्यासाठी पर्यटकांची झुंबड

आपला भारतात फिरण्याची बरीच ठिकाणं आहेत. त्यात दक्षिण भारत तर अद्वितीय आहे. येथे तुम्हाला हिरवळीपासून ते समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळांपर्यंत, नैसर्गिक सौंदर्यासह सर्वकाही पाहायला मिळेल. अशातच तुम्ही दक्षिण भारत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आजच्या लेखात तुम्ही कोणत्या ठिकाण एक्सप्लोर करू शकता आणि किती खर्च येईल ते जाणून घेऊयात.

भारतातील या काही ठिकाणांना एक्सप्लोर करण्यासाठी पर्यटकांची झुंबड
| Edited By: | Updated on: Oct 29, 2025 | 11:34 PM
Share

आपल्या भारतातील दक्षिण भारत देश हा एक असा भाग आहे जो निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्माचा एक अनोखा मिलाफ आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. केरळ त्याच्या हिरवळीसाठी, तामिळनाडू त्याच्या भव्य मंदिरांसाठी आणि कर्नाटक त्याच्या कॉफीच्या बागांसाठी ओळखले जाते. एकंदरीत तुम्ही जर खरोखरच फिरायला जाण्यासाठी एक चांगले ठिकाण शोधत असाल, तर दक्षिण भारतापेक्षा सर्वात उत्तम काहीच नाही. समुद्रकिनाऱ्यांपासून ते पर्वत आणि धार्मिक स्थळांपर्यंत, तुम्हाला एक अनोखा अनुभव मिळेल. स्वादिष्ट अन्न, पारंपारिक नृत्य आणि लोकसंस्कृती ही देखील दक्षिण भारताची खास वैशिष्ट्ये आहेत.

दक्षिण भारतात एक्सप्लोर करण्यासारखे बरेच काही आहे. कुठे जायचे, तिथे कसे जायचे आणि किती खर्च येईल याबद्दल लोकं अनेकदा गोंधळलेले असतात. जर तुम्ही दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही दक्षिण भारतातील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत आणि 3 दिवस फिरण्याचा खर्च किती होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

केरळमधील निसर्गाचा आनंद घ्या

केरळ हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. केरळ हे असे राज्य आहे जिथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात हरवून गेल्यासारख वाटेल. कारण हे राज्य हिरव्यागार झाडांनी भरलेले आहे. अलेप्पीचे बॅकवॉटर, आयुर्वेदिक मसाले आणि हाऊसबोट्स हे पाहून फिरण्याचा आनंद द्विगुणित करेलच पण संस्मरणीय बनवू शकतात. मुन्नार, एक हिल स्टेशन, अलेप्पी, कोची आणि थेक्कडी अशी अनेक ठिकाणे देखील आहेत. केरळमधील कोणत्याही शहरात जाण्यासाठी तुम्ही विमान आणि ट्रेनने जाऊ शकता. केरळ फिरण्याचा खर्च तुमच्या राहण्याचा खर्च, जेवण आणि पर्यटनावर अवलंबून 10,000 ते 20,000 रुपयांपर्यंत होऊ शकतो.

तामिळनाडूची प्राचीन मंदिरे करा एक्सप्लोर

तामिळनाडू हे त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. शिवाय हे राज्य त्याच्या संस्कृती, शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमसाठी प्रसिद्ध आहे. मदुराई (मीनाक्षी मंदिर), तंजावर, रामेश्वरम आणि कन्याकुमारी ही ठिकाणे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहेत. जर तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी दक्षिण भारतात येत असाल तर तामिळनाडूपेक्षा चांगले काहीही नाही. येथील मंदिरे इतकी सुंदर आहेत की तुम्ही त्यांच्या सौंदर्याने मोहित व्हाल. समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्याने सूर्यास्ताचे एक चित्तथरारक दृश्य दिसते. तुम्ही येथे ट्रेन, विमान किंवा स्वत:च्या गाडीने तामिळनाडूला जाण्यासाठी प्रवास करू शकता. बजेटनुसार, ते केरळपेक्षा थोडे स्वस्त आहे. तुम्ही 8,000 ते 15,000 रुपयांना येथील ठिकाणांना भेट देऊ शकता.

कर्नाटक देखील एक चांगला पर्याय आहे

कर्नाटक पर्यटकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्हाला इतिहास आणि निसर्गाचा संगम दिसेल. हंपीच्या अवशेषांपासून ते कॉफीच्या बागांपर्यंत, येथील प्रत्येक गोष्ट खरोखरच मनमोहक आहे. म्हैसूर पॅलेस देखील कर्नाटकात आहे, जो दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करतो. कर्नाटकमध्ये असंख्य हिल स्टेशन्स देखील आहेत, जिथे ट्रेकिंग, पॅलेस टूर आणि कॉफीची चव घेण्याचा अनुभव मिळतो जे दक्षिण भारताचे खास वैशिष्ट्य आहे. कर्नाटकमध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, त्यामुळे तुम्ही विमानाने देखील या ठिकाणी पोहोचू शकता. रेल्वे प्रवास थोडा जास्त असू शकतो. बजेटच्या बाबतीत, जर तुम्ही पॅकेज घेऊन गेलात तर तुम्ही सुमारे 30,000 रूपये खर्च येऊ शकतो.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!