AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू कुटुंबात जन्म, पण जातीतून बहिष्कृत केल्यानं मुस्लीम धर्म स्वीकारला, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

Know This: भाई हा शब्द काढण्यामागे एक समज होता, हा समज की ज्या व्यक्तीच्या नावामागे भाई आहे, तो हिंदू असेल. हीच ओळख जिन्ना यांना नको होती

हिंदू कुटुंबात जन्म, पण जातीतून बहिष्कृत केल्यानं मुस्लीम धर्म स्वीकारला, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे वडील हिंदू कुटुंबात जन्माला आले. पण एका घटनेमुळे त्यांनी धर्म बदलला
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 11:43 AM
Share

मोहम्मद अली जिना यांचा जन्म 25 डिसेंबर 1876 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. जसे ते जन्माला आले, त्यांच्या नावासोबत भाई या शब्द लावण्यात आला. त्याचं नाव मोहम्मद अली जिनाभाई असं होतं. जिन्ना 18 वर्षांचे झाल्यावर त्यांनी 2 मोठे निर्णय घेतले. त्यातील पहिला निर्णय होता, त्यांनी सर्वात आधी आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं. ( Why did Muhammad Ali Jinnah remove the word ‘Bhai’ from his name? Hindu Takkhar Family then converted to Islam.)

दुसरी गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे त्याच्या नावाच्या मागे लागलेला ‘भाई’ हा शब्द काढून टाकला. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांनी हे काम केलं. भाई हा शब्द काढण्यामागे एक समज होता, हा समज की ज्या व्यक्तीच्या नावामागे भाई आहे, तो हिंदू असेल. हीच ओळख जिन्ना यांना नको होती, मात्र, त्यांच्या कुटुंबातील इतर सर्व पुरुष सदस्यांच्या नावामागे भाई हा शब्द कायम राहिला.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे वडील हिंदू कुटुंबात जन्माला आले. पण एका घटनेमुळे त्यांनी धर्म बदलला आणि मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यांनी धर्मच बदलला नाही तर त्याचं पालनही केलं, आणि आपल्या मुलांनाही त्याच धर्माची शिकवण दिली.

जिन्ना कुटुंब मूळचं गुजरातमधील काठियावाडचं. गांधीजी आणि जिन्ना या दोघांची पायमूळं याच भूमीतली. त्यांच्या आजोबांचे नाव प्रेमजीभाई मेघजी ठक्कर. ते हिंदू होते. ते काठियावाडमधील पनेली गावचे ते रहिवासी. प्रेमजी भाईंनी मत्स्य व्यवसायातून भरपूर पैसे कमवले. त्या काळी त्यांच्या परदेशातही व्यापार होत होता. पण ते ज्या जातीसमुदायातून येत होते, त्या लोहना जातीसमुदायाला त्यांचा हा व्यवसाय आवडला नाही.

म्हणून जेव्हा प्रेमजीभाईंनी माशांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी त्यातून पैसे कमवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याच जातीतील लोकांनी त्याला विरोध केला. त्यांना सांगण्यात आलं की, जर तुम्ही माशांचा व्यवसाय बंद केला नाही, तर तुम्हाला जातीतून बहिष्कृत केलं जाईल. प्रेमजींनी व्यवसाय चालू ठेवत जातीत परत येण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. लोकांचा बहिष्कार चालूच राहिला. अकबर एस अहमद यांच्या जिन्ना, पाकिस्तान एंड इस्लामिक आयडेंटीटी या पुस्तकात याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.

या बहिष्कारानंतरही, प्रेमजी हिंदूच राहिले, पण त्यांचा मुलगा पुंजालाल ठक्करला त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा बहिष्कार इतका अपमानास्पद वाटला की, त्यांनी रागाच्या भरात पत्नीसह त्याच्या चार मुलांचाही धर्म बदलला. ते मुसलमान झाले. मात्र, प्रेमजींचे बाकी मूलं हे हिंदू धर्मातच राहिले. यानंतर जिनाचे वडील पुंजालाल हे कुटुंबापासून तुटले गेले आणि ते काठियावाडहून कराचीला आले.

कराचीला जिन्नांच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीला आला. तो इतका समृद्ध झाला की, त्याच्या कंपनीचे कार्यालय त्यांनी थेट लंडनमध्ये उघडलं. असे म्हटले जाते की, जिनांचे बरेच नातेवाईक अजूनही हिंदू आहेत आणि गुजरातमध्ये राहतात.

हेही वाचा:

Gandhi Jayanti 2021: राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ भन्नाट गोष्टी, ज्या तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील

23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!

 

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.