AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri).

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली
| Edited By: | Updated on: Aug 29, 2020 | 3:17 PM
Share

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri). सुमद्राचे अतिक्रमण झाले असून लाटांच्या तांडवात नारळाची झाडं उन्मळून पडली आहेत. झाडं पडल्यामुळे जवळपास अर्धा किलोमीटर भागाची धुप झाली आहे. सलग दुसर्‍या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनार्‍यावर हा प्रकार घडला आहे (Coconut tree fall Ratnagiri).

तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील भाट्ये किनार्‍यावर समुद्राच्या भरतीचे पाणी आतमध्ये घुसले होते. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून गेली. भरतीच्या लाटांबरोबर एकापाठोपाठा एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार एका झाडाचे नुकसान अडीच हजार रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचे मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे. गतवर्षी भाट्ये किनार्‍याची अशाचप्रकारे धुप झालेली होती. त्यामुळे येथे सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलणे आवश्यक आहेत.

दरम्यान, नुकतेच कोकणात वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे. वादळामुळे कोकणातील सुपारी, पोफळी, आंब्याची झाडं त्याशिवाय इतर अनेक झाडं पडली आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

Cyclone | रत्नागिरीत सुपारी, पोफळी, आंब्यांची झाडे जमीनदोस्त, राजू शेट्टी म्हणतात…

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत घरावर झाड कोसळलं

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.