AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri).

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली
| Edited By: | Updated on: Aug 29, 2020 | 3:17 PM
Share

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri). सुमद्राचे अतिक्रमण झाले असून लाटांच्या तांडवात नारळाची झाडं उन्मळून पडली आहेत. झाडं पडल्यामुळे जवळपास अर्धा किलोमीटर भागाची धुप झाली आहे. सलग दुसर्‍या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनार्‍यावर हा प्रकार घडला आहे (Coconut tree fall Ratnagiri).

तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील भाट्ये किनार्‍यावर समुद्राच्या भरतीचे पाणी आतमध्ये घुसले होते. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून गेली. भरतीच्या लाटांबरोबर एकापाठोपाठा एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार एका झाडाचे नुकसान अडीच हजार रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचे मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे. गतवर्षी भाट्ये किनार्‍याची अशाचप्रकारे धुप झालेली होती. त्यामुळे येथे सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलणे आवश्यक आहेत.

दरम्यान, नुकतेच कोकणात वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे. वादळामुळे कोकणातील सुपारी, पोफळी, आंब्याची झाडं त्याशिवाय इतर अनेक झाडं पडली आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

Cyclone | रत्नागिरीत सुपारी, पोफळी, आंब्यांची झाडे जमीनदोस्त, राजू शेट्टी म्हणतात…

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत घरावर झाड कोसळलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.