AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या ‘बूस्टर डोस’ने औरंगाबादेत लसीकरण सुसाट, जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा, चार दिवसात 1 लाखावर डोस

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तब्बल एक लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरीही उद्दिष्टाच्या तुलनेत अजून पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 24 टक्केच आहे.

मोदींच्या 'बूस्टर डोस'ने औरंगाबादेत लसीकरण सुसाट, जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा, चार दिवसात 1 लाखावर डोस
औरंगाबादमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 17, 2021 | 10:51 AM
Share

औरंगाबादः देशात लसीकरणात (Corona Vaccination) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunul Chavan) यांच्याशी बातचित केली होती. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या औरंगाबादेत लसीकरण मागे पडणे ही खूप गंभीर बाब असल्याचं त्यांनी बैठकीत म्हटलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचंड वेगाने सूत्रे हालवत संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरातील महापालिका (Aurangabad Municipal corporation) क्षेत्रांमध्ये लसीकरण सक्तीसाठी नियम बनवले. प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आल्यामुळे ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील चार दिवसातच औरंगाबादमध्ये 1 लाख जणांना लस देण्यात आली.

लसीकरण जोमात, उद्दीष्ट आणखी दूरच

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तब्बल एक लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरीही उद्दिष्टाच्या तुलनेत अजून पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 24 टक्केच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लस न घेणाऱ्यांवर अनेक ठिकाणी निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी खेड्यात, मनपा घरोघरी

जिल्ह्यासाठीचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. महापालिकेने ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत 52,149 घरांचे सर्वेक्षण केले. तर अनेकांच्या घरी फोन करून लसीकरणाबाबत विचारपूस करण्यात आली. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी खुलताबाद तालुक्यातील गल्लोबोरगावात जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. एका शेतकऱ्याकडे मुक्कामही केला.

अजून 13 लाखांचे लसीकरण बाकी

औरंगाबाद शहरातील 10 लाख 55 हजार 654 आणि ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 एवढ्या म्हणजेच एकूण 32 लाख 24 हजार 677 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 18 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच अजूनही जिल्ह्यातील 13 लाख 32 हजार 31 लोकांनी लस घेतलेली नाही. जिल्ह्यात फक्त 24.86 टक्के लोकांचेच दोन्ही डोस झाले आहेत. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

इतर बातम्या-

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक