AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतकडून रामदास आठवलेंच्या तब्येतीची विचारपूस, वाढदिवशी सहभोजनाचे निमंत्रण!

कोरोनावर मात केल्यानंतर तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॉ. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना फोन केला होता.

Ramdas Athawale | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतकडून रामदास आठवलेंच्या तब्येतीची विचारपूस, वाढदिवशी सहभोजनाचे निमंत्रण!
| Updated on: Nov 22, 2020 | 6:54 PM
Share

मुंबई : कोरोनावर मात केल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॉ. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना फोन केला होता. यावेळी राखी सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या स्नेहभोजनात सहभागी होण्यासाठी रामदास आठवले यांना आमंत्रण दिले. काही दिवसांपूर्वी राखी यांनी लग्न केल्याच्या बातम्या येत होत्या, याबाबतची माहिती स्वतः राखी सावंत यांनी आठवलेंना दिली. यावेळी आठवले यांनी राखी सावंत आणि त्यांच्या पतीलाही शुभेच्छा दिल्या (Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale).

रामदास आठवले यांना 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली. ‘मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे’, असे म्हणत रामदास आठवले यांनी कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले होते.

कोरोनामुक्त झाल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

रामदास आठवले यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसत नव्हती. त्यांची प्रकृती ही उत्तम होती. पण खबरदारीचा उपाय म्हणून 4 दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन आठवले यांनी केले होते.

रामदास आठवले यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामदास आठवले उपचार घेत असलेल्या रुग्णालयापासून ते घरापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कोरोनामुक्तीसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या (Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale).

कलाकारांना आठवलेंचा खंबीर पाठिंबा

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा, असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला.

या आधीही रामदास आठवलेंनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील जाहीर पाठिंबा दर्शवला होता. आता राखी सावंतने देखील रामदास आठवलेंची आस्थेने विचारपूस केली आहे. इतकेच नव्हेतर, त्यांना सहभोजनाचे आमंत्रण देखील दिले आहे.

(Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.