AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : जवळचा मित्र, आता आहे शत्रू, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्याने लिहिले केवळ दोनच शब्द

केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली. अनेक नेते आपपासून दुरावले आहेत. मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते अरविंद केजरीवाल आणि आपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

Arvind Kejriwal : जवळचा मित्र, आता आहे शत्रू, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्याने लिहिले केवळ दोनच शब्द
arvind kejriwal and kapil mishraImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 22, 2024 | 5:57 PM
Share

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर त्यांच्या एकेकाळच्या अत्यंत जवळच्या मित्राने केवळ दोन शब्दांची पोस्ट केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे हा जुना मित्र पण आताचा शत्रू खूपच आनंदित झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल यांचा हा पूर्वीचा मित्र आहे कपिल मिश्रा. मात्र, आता ते केजरीवाल यांचे कट्टर शत्रू झाले आहेत. केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे ते खूप खुश झालेत.

अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून कपिल मिश्रा हे त्यांचे मित्र होते. केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली. अनेक नेते आपपासून दुरावले आहेत. मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते अरविंद केजरीवाल आणि आपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

गुरुवारी ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा कपिल मिश्रा यांना आनंद झाला. केजरीवाल यांना अटक झाल्याचे समजताच मिश्रा यांनी केवळ दोन शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘सत्यमेव जयते’ हे दोनच शब्द लिहिले आहेत.

अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशी करत होती. त्यावेळी कपिल मिश्रा यांनी एक पोस्ट लिहिली होती. केजरीवाल यांना अटक झाल्यास दिल्लीतील लोकांना न्याय मिळेल असे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले होते.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे जे लोक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते. त्यांनाच दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर केजरीवाल पूर्णपणे बदलले आहेत असे वाटले. त्या लोकांच्या यादीत कपिल मिश्रा हे नाव अग्रणी होते. कपिल मिश्रा यांनी केवळ त्या आंदोलनात भाग घेतला. आम आदमी पार्टी (आप) ची स्थापना झाली तेव्हा केजरीवाल यांच्यासोबत त्यांची मैत्री घट्ट झाली होती. पण. नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि मिश्रा भाजपमध्ये सामील झाले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.