AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली (Anil Parab slams BJP).

'आत्मनिर्भर'च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 05, 2020 | 3:23 PM
Share

मुंबई :आत्मनिर्भरच्या नावाखाली भाजपवाले कोकणवासियांची दिशाभूल करत आहेत (Anil Parab slams BJP). कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. मात्र, भाजप नेत्यांकडून नागरिकांना खोटी माहिती दिली गेली”, अशी टीका रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केली (Anil Parab slams BJP).

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (5 जुलै) झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचली नाही, अशी खोटी माहिती भाजपकडून दिली जात आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 116 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी 54 कोटींचे वाटप झाले तर 62 कोटींचे वाटप सुरु आहे. अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील मिळाली आहे”, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा : रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं”, असंदेखील अनिल परब म्हणाले.

“स्वतः मुख्यमंत्री कोकणच्या दौऱ्यावर आले. कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. यावर कोणीही बोलत नाही. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना निधीबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची चाचणी प्रयोगशाळा सुरु केली. त्यावरही कोणी बोलत नाही”, असा घणाघात अनिल परब यांनी केला.

हेही वाचा : खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा

“कोकणातील आलेल्या निधीपैकी 46.51 टक्के निधीचे वाटप झाले आहे. कोकणात गुंठेवारी शेती केली जाते. त्यामुळे अनेकांची नावे त्यावर असतात. त्यामुळे मदत देताना अडचणी येतात. मात्र, अशाप्रकारे अडचणी येत असतील तर नुकसान भरपाई देताना हमीपत्र घ्या, अशी मागणी आम्ही केली आहे. ती मान्य झाली आहे. त्यामुळे आता मदत वाटपात काही अडचण येणार नाही”, असंदेखील अनिल परब यांनी सांगितलं.

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान