AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून लष्कर आणि जनतेला सतर्कतेचे आदेश, बदला घेण्याची भाषा

नवी दिल्ली : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आता कांगावा सुरु केलाय. भारताला उत्तर देण्याची भाषा करत पाकिस्तानने त्यांची जनता आणि लष्कराला सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा प्रमुख मंत्र्यांनी बैठक झाली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. बैठकीनंतर पाकिस्तानकडून पत्रकार […]

पाकिस्तानकडून लष्कर आणि जनतेला सतर्कतेचे आदेश, बदला घेण्याची भाषा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आता कांगावा सुरु केलाय. भारताला उत्तर देण्याची भाषा करत पाकिस्तानने त्यांची जनता आणि लष्कराला सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा प्रमुख मंत्र्यांनी बैठक झाली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

बैठकीनंतर पाकिस्तानकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. भारताने हल्ला केलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मीडियाला नेऊन घटनेची स्थिती दाखवली जाईल, असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. शिवाय भारताने मोठ्या प्रमाणात नुकसान करत दहशतवादी मारले असल्याचा दावा खोटा असल्याचंही पाकिस्तानने म्हटलंय.

भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत सीमा ओलांडली. जागा आणि स्थळ निवडून याचं उत्तर दिलं जाईल, असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. इम्रान खानने 27 फेब्रुवारीला नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली आहे. लष्कर आणि जनतेने सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार रहावं, असं आवाहन पाकिस्तान सरकारने केलंय.

भारताकडून असं काही तरी केलं जाईल हे आम्ही सातत्याने सांगत होतो. अखेर त्यांनी आज हे केलंच. पाकिस्तानला स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही पाकिस्तानने म्हटलंय.

भारताकडून पुलवामा हल्ल्याचा बदला

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...