AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली-बिहारमध्ये ‘बंदी सरकार’, आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे.

दिल्ली-बिहारमध्ये 'बंदी सरकार', आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात
| Updated on: Oct 27, 2020 | 11:01 AM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावर बिहार आणि दिल्लीतील सरकारचा भर असून ही दोन्ही सरकारे म्हणजे ‘बंदी सरकार’ आहेत, असा टोला लगावतानाच आता बिहारमध्ये परिवर्तन घडवलंच पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी करून हा घणाघाती हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणि बिहारमधील नितीशकुमार सरकारने जनतेवर केवळ ‘बंदी’ लादण्यापलिकडे काहीही केलं नाही. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावरच या दोन्ही सरकारांचा भर राहिला आहे. त्यामुळे या बंदी सरकार विरोधात बिहारची जनता उभी ठाकली असून आता बदल घडवण्याची वेळ आली आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आज बिहारचे सत्ताधीश अहंकारात बुडून गेले असून विकासाच्या मार्गापासून कोसो मैल दूर गेले आहेत. त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीत बदल झाला आहे. मजदूर, शेतकरी, तरुणांना नैराश्याने गाठले आहे. त्रस्त झाले आहेत. अर्थव्यवस्था डबघाईला आली असून त्याचा लोकांवर परिणाम झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

बिहार सरकारने दलित आणि महादलितांना वाऱ्यावर सोडलं आहे. इतर मागास समाजही सुख-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आता बिहारच्या जनतेने काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या जनतेने महाआघाडीला मतदान करून बिहारमध्ये बदल घडवून आणावा, असं आवाहनही त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे. सोनिया गांधी यांचा हा व्हिडीओ तब्बल पाच मिनिटाचा असून या व्हिडीओत त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशापासून ते बिहार सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे. तसेच या व्हिडीओतून त्यांनी शेतकरी, दलित, महिला अत्याचार, तरुण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांना हात घालून बिहार आणि केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

संबंधित बातम्या:

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

(Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?