AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली-बिहारमध्ये ‘बंदी सरकार’, आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे.

दिल्ली-बिहारमध्ये 'बंदी सरकार', आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात
| Updated on: Oct 27, 2020 | 11:01 AM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावर बिहार आणि दिल्लीतील सरकारचा भर असून ही दोन्ही सरकारे म्हणजे ‘बंदी सरकार’ आहेत, असा टोला लगावतानाच आता बिहारमध्ये परिवर्तन घडवलंच पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी करून हा घणाघाती हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणि बिहारमधील नितीशकुमार सरकारने जनतेवर केवळ ‘बंदी’ लादण्यापलिकडे काहीही केलं नाही. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावरच या दोन्ही सरकारांचा भर राहिला आहे. त्यामुळे या बंदी सरकार विरोधात बिहारची जनता उभी ठाकली असून आता बदल घडवण्याची वेळ आली आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आज बिहारचे सत्ताधीश अहंकारात बुडून गेले असून विकासाच्या मार्गापासून कोसो मैल दूर गेले आहेत. त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीत बदल झाला आहे. मजदूर, शेतकरी, तरुणांना नैराश्याने गाठले आहे. त्रस्त झाले आहेत. अर्थव्यवस्था डबघाईला आली असून त्याचा लोकांवर परिणाम झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

बिहार सरकारने दलित आणि महादलितांना वाऱ्यावर सोडलं आहे. इतर मागास समाजही सुख-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आता बिहारच्या जनतेने काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या जनतेने महाआघाडीला मतदान करून बिहारमध्ये बदल घडवून आणावा, असं आवाहनही त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे. सोनिया गांधी यांचा हा व्हिडीओ तब्बल पाच मिनिटाचा असून या व्हिडीओत त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशापासून ते बिहार सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे. तसेच या व्हिडीओतून त्यांनी शेतकरी, दलित, महिला अत्याचार, तरुण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांना हात घालून बिहार आणि केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

संबंधित बातम्या:

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

(Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात