AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर तुमच्यात हे गुण असतील तर प्रत्येक कामात येईल यश, मुठीत असेल जग सारे

आचार्य चाणक्य यांचा 'चाणक्य नीती' हा ग्रंथ केवळ सैद्धांतिक ग्रंथ नसून दैनंदिन व्यावहारिक ज्ञानाचा एक मोठा खजाना आहे. त्यांच्या पुस्तकात त्यांनी अशा एका गुणाची चर्चा केली आहे, ज्याचा विकास करून माणूस प्रत्येक कामात विजय मिळवू शकतो आणि जग आपल्या मुठीत घेऊ शकतो. चला तर पाहूयात, हा गुण काय आहे?

Chanakya Niti : जर तुमच्यात हे गुण असतील तर प्रत्येक कामात येईल यश, मुठीत असेल जग सारे
| Updated on: Nov 19, 2024 | 8:34 PM
Share

भारतीय इतिहासात आचार्य चाणक्य हे महान अर्थ शास्रज्ञ होऊन गेले. त्यांनी राजनीती, अर्थशास्र, नितीशास्र आणि कूटनीतीचे जाणकार होते. चाणक्य यांच्या नीतीशास्रावर चालून चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंशाची स्थापना करुन भारतात पहिले साम्राज्य स्थापन केले होते. ज्याला मगध साम्राज्य म्हटले जाते. जर आचार्य चाणक्य यांची साथ नसती तर हे साम्राज्य स्थापन झाले नसते. त्यांच्या दूरदृष्टीने मौर्य साम्राज्याला एक मजबूत आणि समृद्ध साम्राज्यात परिवर्तित केले.

आचार्य चाणक्यांच्या मते शत्रूला मित्र बनविणे आणि किंवा मित्राला शत्रू बनविणे राजनितीच्या महत्वाचा हीस्सा आहे. चाणक्य यांचे नितीशास्र आजही लागू होते. राजकारणी, व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांना यातून प्रेरणा मिळते. चाणक्यांच्या गोष्टी केवळ पुस्तकी नाही. ते रोजच्या जीवनाशी संबंधित त्या असतात. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य निती पुस्तकात एका गुणाने युक्त अशा व्यक्तीची गोष्ट सांगितली आहे.जो नेहमी बिनधास्त, निष्कलंक आणि अपराजित रहातो. त्यांनी असे गुण विकसित करण्याचा सल्ला दिला आहे ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळते.

असा व्यक्ती जग जिंकतो –

आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत सांगितले आहेत. आपल्या मनाला आणि विचारांना आपला दास बनविणारा व्यक्ती नेहमी इतर लोकांपेक्षा दोन पाऊले पुढे असतो. असा गुण आहे जो असाच व्यक्ती विकसित करु शकतो जो केवळ बुद्धीमानच नाहीत तर आचरणात सदाचारी आणि खूपच व्यवहारीक असतात. मन आणि विचार जिंकणारे लोक जग जिंकण्याची ताकद बाळगतात.

प्रत्येक कामात यश –

चाणक्य यांनी म्हटले की आपले मन एक शक्तीशाली उपकरण आहे. हे आपल्या विचार,भावनांवर आणि कार्यावर नियंत्रण ठेवते. जर आपण आपल्या मनाला नियंत्रित केले तर आपण आपल्या जीवनाला कोणत्याही दिशेला वळवू शकतो. जे लोक स्वत:वर नियंत्रण ठेवण्यात शिकतात ते जीवनात नवनवीन शिखरे पादाक्रांत करतात.त्यांचे यश आधीच्या यशा पेक्षा मोठे असते. हे लोक धन-दौलतीच्या राशी मिळवू शकतात. आणि त्यांना पैशाची आसक्ती नसल्याने ते नेहमी आनंदी राहतात.

जग असणार मुठ्ठीत –

लोकांना जर स्वत:ला नियंत्रित करता आले तर ते जगाला देखील आपल्या तालावर नाचवू शकतील. ही वचन एक सत्य आहे.याचा उल्लेख केवळ चाणक्य नितीतच नाही तर वेद, उपनिषद, आरण्यक, स्मृती ग्रंथासहित सर्व भारतीय निती ग्रंथात केलेला आहे. जेव्हा कोणी व्यक्ती स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढत असतो. आणि आत्मविश्वास हीच तर यशाची चावी आहे.

Follow Us
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण