AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?

लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 11, 2020 | 12:20 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते राज्यातील नागरिकांना संबोधित करतील. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी लॉकडाऊन पूर्णपणे शिथील न केल्यामुळे दैनंदिन व्यवहारांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. तर मुंबईसारख्या शहरात जनतेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

याशिवाय, गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी मराठा संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा संघटनांच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांचे समाधान झाले असले तरी समाजाच्या इतर स्तरांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सगळ्यावर काही निर्णायक भाष्य करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेकडून लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरे कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, मुख्यमंत्री काय बोलणार?

सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Watch LIVE: Facebook: https://bit.ly/2TZbpTX Twitter: https://bit.ly/30RheWt YouTube: https://bit.ly/33JEnMA Instagram: https://bit.ly/3iVaE7T

संबंधित बातम्या:

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

(CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...