AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायू आणि पाणी प्रदुषणाने आयुष्य कमी होतंय, मग फाशीची गरज काय? निर्भया बलात्कारातील दोषीचा युक्तीवाद

देशभरात संतापाची लाट तयार करणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंह याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे (Convicted criminal of Nirbhaya rape).

वायू आणि पाणी प्रदुषणाने आयुष्य कमी होतंय, मग फाशीची गरज काय? निर्भया बलात्कारातील दोषीचा युक्तीवाद
| Updated on: Dec 10, 2019 | 11:52 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात संतापाची लाट तयार करणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंह याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे (Convicted criminal of Nirbhaya rape). यात त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी केलेला युक्तीवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोषी अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दावा केला आहे की याच युक्तीवादामुळे फाशीची शिक्षा रद्द करण्याची याचिका सहजपणे मंजूर होईल (Convicted criminal of Nirbhaya rape).

आपल्या याचिकेत दोषी अक्षयने म्हटले आहे, “दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्तरावर गेली आहे. हवा प्रदुषणामुळे दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झाली आहे. इतकंच नाही तर दिल्लीतील पाण्यात देखील विष मिसळलं जात आहे. हे वास्तव सरकारने नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालातून सिद्ध झालं आहे. दिल्लीत हवा आणि पाण्याबाबत काय घडत आहे याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. यामुळे आधीच आयुष्य अत्यंत कमीकमी होत आहे. अशा स्थितीत फाशीच्या शिक्षेची गरज काय?”

अक्षय कुमार सिंह 2012 मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध झाला आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी रात्रीच्या वेळी दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण झाले. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन झाले. यावेळी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी झाली. न्यायालयाने देखील हा निर्घृण गुन्हा असल्याचं म्हणत आरोपींना फाशीची शिक्षा दिली. यातील दोषी अक्षयच्या शिक्षेला ट्रायल कोर्टापासून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वाच्च न्यायालयाने देखील कायम ठेवलं आहे.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.