AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | देशात 24 तासात 4 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ

गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात 4,213 नवे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.

Corona Update | देशात 24 तासात 4 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ
| Updated on: May 12, 2020 | 12:49 AM
Share

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 67 हजारांच्या (Corona Update In India) पार गेली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात 4,213 नवे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे 11 मे रोजीच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 67 हजार 152 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 4 हजार 213 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रुग्ण बरे (Corona Update In India) होण्याचा दरही 31.15 टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाची लक्षणं दिसताच हॉस्पिटलध्ये येण्याचं आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांची क्लीपही दाखवण्यात आली.

“आम्ही लोकांना सांगितलं की, तुम्ही जिथे आहात तिथे थांबा. पण लोकांना आपल्या घरी जायचं आहे. हाच मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आम्हाला काही निर्णय बदलावे लागले. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग गावांपर्यंत पसरणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे”, असं गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव (Corona Update In India) यांनी सांगितलं.

त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये मंगळवारपासून 15 गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु झालं आहे, असंही पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं.

या विशेष रेल्वे नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव , मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू (तवी) या 15 रेल्वे स्टेशन दरम्यान धावतील. ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना गावी जाण्यास याचा फायदा होईल. मात्र, प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंग बिघडणार नाही, याचं भान प्रवाशांनी राखलं पाहिजे, असं पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजारांवर

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात आज (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज (11 मे) दिवसभरात 587 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 4 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात दिवसभरात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 868 वर पोहोचली आहे.

Corona Update In India

संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट : पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण

मजूर बस किंवा श्रमिक रेल्वेनेच मूळगावी जातील याची दक्षता घ्या, केंद्राचे राज्यांना सक्त आदेश

मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई दररोज रेल्वे, कन्फर्म तिकीट हाच पास, टीसीकडून तिकीट मिळणार नाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.