AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर विधानसभेत केजरीवालांचा संताप, कृषी कायद्यांच्या प्रती टराटरा फाडल्या

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तीन कृषी कायद्यांना कडाडून विरोध केला. (Arvind Kejriwal farm law)

भर विधानसभेत केजरीवालांचा संताप, कृषी कायद्यांच्या प्रती टराटरा फाडल्या
दिल्ली विधानसभेत भाषण करत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा प्रकारे कृषी कायद्यांच्या प्रती फाडल्या.
| Updated on: Dec 17, 2020 | 6:27 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP)  अध्यक्ष अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी तीन कृषी कायद्यांना (farm laws) कडाडून विरोध केला. त्यांनी या तिन्ही कायद्यांच्या प्रती चक्क टराटरा फाडल्या. तसेच, आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला. दिल्ली विधानसभेच्या एकदीवसीय अधिवेशनात हा प्रकार घडला.(Delhi chief minister Arvind Kejriwal tears copies of farm laws)

केंद्र सरकारची इंग्रजांशी तुलना

दिल्ली सरकारने गुरुवारी (17 डिसेंबर) एकदिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी कृषी कायद्यांवर अनेक प्रश्न अपस्थित केले. यावेळी बोलताना, “देशात कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर करण्याची काय गरज होती? सरकारने एवढी घाई का केली. राज्यसभेत कुठलेही मतदान न करता कृषी विधेयके मंजूर केली गेली? असा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला. याच कारणामुळे मी हे तिन्ही कृषी कायदे फाडून टाकतोय,” असे केजरीवाल म्हणाले. तसेच, यावेळी केंद्र सरकारने इंग्रजांपेक्षाही क्रुर न होण्याचा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला.

देशातील प्रत्येक शेतकरी भगतसिंग 

“कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असं केंद्र सरकार सांगतं. शेतऱ्यांना तसे समजाऊन सांगण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरच्या मालकी हक्कावर कसलाही परिणाम होणार नसल्याची ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून दिली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय फायदा होत आहे, ते सरकारने सांगावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. तसेच देशातील प्रत्येक शेतकरी आता क्रांतीकारक भगतसिंग झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.

संबंधित  बातम्या :

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं

(Delhi chief minister Arvind Kejriwal tears copies of farm laws)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.