AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा

राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलं आहे (Fail students can also get admission in 10th and 12th class).

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 23, 2020 | 4:56 PM
Share

मुंबई : नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनादेखील दहावी आणि बारावीत प्रवेश मिळू शकतो. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. “जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना तोंडी परीक्षेची संधी देण्यात येईल. ही तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल किंवा वर्गात थेट उपस्थितीत पार पडेल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली (Fail students can also get admission in 10th and 12th class).

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना पुढील वर्गात जाण्याची संधी दिली जाईल. तोंडी परीक्षेसाठी व्हिडीओ कॉल किंवा थेट उपस्थितीचा पर्याय आहे, असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली (Fail students can also get admission in 10th and 12th class).

दहावीचा निकाल कधी?

“कोरोना संकटामुळे दहावीच्या भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, या काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकल्या होत्या. खरंतर एसएससी बोर्डाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चांगली कामगिरी केली. बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता दहावीचादेखील निकाल जाहीर होईल. या महिन्याअखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के गुण होते? शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

शाळा कधी सुरु होणार?

“15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आलं. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु राहीलं पाहिजे, असा प्रयत्न होता. मुलांचं आरोग्य हे आपल्या सर्वांसाठी प्राथमिक आहे. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन, टेलिव्हिजन, गूगल, यूट्यूब यांच्याार्फत शिक्षण सुरु केलं. पण फिजिकल शाळा कधी सुरु करायचं हे आता सांगू शकत नाही. कारण आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, शिक्षण समिती, ग्रामपंचायत यांनी पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत