AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Bogus recruitment case|पुणे जिल्हा परिषदेतही बोगस भरती प्रकरणाचं वादळ, 14 ग्रामसेवकांसह 2 कृषी अधिकाऱ्यांना घरचा रस्ता, नेमकं घोटाळा काय?

या बोगस भरती प्रकरणी आज तब्बल 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच सहा ग्रामसेवकांवर दोषारोपपात्र दाखल करण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. 22 अधिकाऱ्यांच्या चौकशीची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.

Gram Panchayat Bogus recruitment case|पुणे जिल्हा परिषदेतही बोगस भरती प्रकरणाचं वादळ, 14 ग्रामसेवकांसह 2 कृषी अधिकाऱ्यांना घरचा रस्ता, नेमकं घोटाळा काय?
pune zp
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 3:52 PM
Share

पुणे : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal corporation)   नुकताच 23 गावांचा सामेवश झाला. महापालिकेत समावेश होता असतानाचा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य बोगस भरती ( Gram Panchayat Bogus recruitment case) झाल्याचे समोर आले होते. या बोगस भरती प्रकरणी आज तब्बल 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच सहा ग्रामसेवकांवर दोषारोपपात्र दाखल करण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. 22 अधिकाऱ्यांच्या चौकशीची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही कारवाई केली आहे. बोगस भरती प्रकरणी 22 ग्रामपंचायतीमधील माजीसरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अश्या 212 जणांना जिल्हा परिषदेने(zila parishad) नोटिसा बजावल्या होत्या या भरतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पैकी 658 जणांची नियमबाह्य नेमणूक केल्याचे चौकशी समितीच्या लक्षात आले.

यांच्यावरही झाली कारवाई

बोगस भरती प्रकरणी 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायतीतील 69 कर्मचारी त्यांच्या मंजूर आकृतीबंधावर होते, यापूर्वी 247 जणांची भरती करण्यात आली होती आणि ते बऱ्याच दिवसांपासून काम करत होते. परंतु, या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आली. हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीत मांजरी ग्रामपंचायतींमध्ये 44 जणांची भरती झाल्याचे निष्पन्न झाले होते

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता गोंधळ

या बोगसभारतीवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हापरिषद सदस्यांनी या बोगस भरतीमुळे जिल्हा परिषदेचे नाव खराब झाले आहे. यातील दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत जिल्हापरिषद सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याबरोबरच यामध्ये अनेक तरुणांची नोकरी लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक झाल्याचेही समोर आले होते. जिल्हा परिषदेने महापालिकेला पाठविलेल्या दस्तांमध्ये ९२६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, दस्त पालिकेत समाविष्ट होताच भरतीचा आडका १ हजार १२८ पर्यंत पोहचला होता.

पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका

Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 December 2021

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...