AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

शेती व्यवसायाला चालना आणि शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Haryana government horticulture farming)

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; 'या' नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
हरियाणातील शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना विमाकवच देण्यात येईल
| Updated on: Jan 02, 2021 | 11:04 AM
Share

चंदीगड : शेती व्यवसायाला चालना आणि शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा या गोष्टी लक्षात घेऊन हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथील शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारने ‘मुख्यमंत्री बागबानी फसल बीमा योजना‘ (CM Fasal Bima Yojana) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना विमाकवच देण्यात येईल. या योजनेचा फायदा बागायती शेतकऱ्यांना होणार आहे. (Haryana government announced new scheme of insurance for horticulture farming)

योजनेचं स्वरुप काय ?

हरियाणा सरकारने लागू केलेल्या या नव्या योजनेनुसार बागायती पिकांना विमाकवच मिळणार आहे. पिकाचे काही नुकसान झाल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान फसल बीमा योजनेच्या (PM Fasal Bima Yojana) धर्तीवर बागायती पिकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत 14 भाज्या, चार फळपीक आणि दोन मसाले उत्पादनांच्या नुकसानीवर भरपाई मिळेल. या योजनेनुसार शेतकऱ्यांना विम्याच्या एकूण रकमेपैकी 2.5 टक्के रक्कम भरावी लागेल. उरलेली रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांचा काय फायदा ?

हरियाणा सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकाच्या सुरक्षेची हमी मिळेल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतात लावलेल्या भाजांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 30 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच, नैसर्गिक संकटामुळे (Natural Disaster) पिकाचे नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना 40 हजार रुपये प्रति एकर या प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.

कोणकोणत्या पिकांना विमाकवच

मुख्यमंत्री बागायती शेती विमा योजनेमध्ये अनेक पिकांचा समावेश आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा, फुलगोबी, वटाणा, भेंडी, कारली, वांगी, मिर्ची, शिमला मिर्ची, हळद, लसण, आंबे, बोर या पिकांच्या लगवडीनंतर शेतकरी या पिकांचा विमा उतरवू शकतात. त्यानंतर फळपिकांचे नुकसान झाल्यास मुख्यमंत्री बागबानी फसल बीमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.

दरम्यान, हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या या नव्या योजनेमुळे बागायती शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय शेतकरी प्रोग्रेसिव्ह असोसिएशन संघटनेचे शेतकरी तसेच पदाधीकारी यांनी मनहोरलाल सरकारच्या या निर्णयाचे स्वगत केले आहे.

संबंधित बातम्या :

कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘व्हिटामिन ए’ची कमतरता भरून काढणाऱ्या विदेशी रताळ्याच्या पिकाने मिळेल दुप्पट उत्त्पन्न!

नवीन वर्षात एक लाख जिंका, मोदी सरकारकडून खास संधी

(Haryana government announced new scheme of insurance for horticulture farming)

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.