AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RAILWAY : टाईमपास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाताय? ही चूक करू नका, भरावा लागेल दंड

कोणत्या ना कोणत्या उद्देशाने स्टेशनवर येऊन टाईमपास करणारेही कमी नाहीत. रेल्वे स्टेशन हे काही पाहण्यासारखे ठिकाण नाही. त्यामुळे कोणत्याही उद्देशाशिवाय रेल्वे स्टेशनवर येणे हे नियमावलीच्या विरोधात आहे.

RAILWAY : टाईमपास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाताय? ही चूक करू नका, भरावा लागेल दंड
RAILWAYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 15, 2024 | 10:07 PM
Share

नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : रेल्वे परिसरात अथवा स्टेशनवर टाईमपास करणारे प्रवासी, फेरीवाले यांच्याविरोधात रेल्वे प्रशासनाने नवी नियमावली आणली आहे. रेल्वे स्टेशन हे प्रवाशी यांच्यासाठी आहे. ते काही प्रेक्षणीय स्थळ नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर येऊन प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या आगंतुकांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही उद्देशाशिवाय रेल्वे स्टेशनवर येणे हे नियमावलीच्या विरोधात आहे. यापुढे अशा व्यक्तीला जबदरस्त दंड ठोठावला जाणार आहे.

प्रवासी रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी येतात किंवा ट्रेनमधून उतरून त्यांच्या पुढील गंतव्यस्थानी जातात. एक ट्रेन सुटली तर पुढील ट्रेनची वाट पाह्ण्याखेरीज काही प्रवाशांना पर्याय नसतो. तर, काही व्यक्ती प्रवाशांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येतात आणि ट्रेन सुटेपर्यंत स्टेशनवर रेंगाळत असतात. अशा व्यक्तींकडे तिकीट असली तरी त्या व्यक्तीला आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

त्याचप्रमाणे कोणत्या ना कोणत्या उद्देशाने स्टेशनवर येऊन टाईमपास करणारेही कमी नाहीत. रेल्वे स्टेशन हे काही पाहण्यासारखे ठिकाण नाही. त्यामुळे कोणत्याही उद्देशाशिवाय रेल्वे स्टेशनवर येणे हे नियमावलीच्या विरोधात आहे. अशी व्यक्ती रेल्वे स्टेशनवर आढळल्यास त्याला 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.

अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत बसतात. अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की प्रवासी प्लॅटफॉर्मवर चादरी पसरून झोपतात आणि दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडतात. अशाप्रकारे स्थानकात थांबणे मान्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही हेतूशिवाय स्थानकात बसणे, फिरणे हे रेल्वे नियमावलीनुसार गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. गर्दीच्या स्थानकांवर रेल्वेकडून अशा लोकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते असेही त्यांनी सांगितले. देशात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. A, B, C आणि D अशा चार श्रेणीतील ही रेल्वे स्थानके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.