AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर

राज्यातलं सरकार हे अमर अकबर अँथोनीचं सरकार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तितक्याच शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिलंय.

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर
| Updated on: Oct 07, 2020 | 5:45 PM
Share

मुंबई :  महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तितक्याच शायराना अंदाजात उत्तर दिलंय. (Home Minister Anil Deshmukh reply Raosaheb Danve On his Amar Akbar Anthony Statement)

रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अनिल देशमुख यांनी उत्तर देताना म्हटलंय,  “दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !”

रावसाहेब दानवे यांनी ‘अमर अकबर अँथोनी’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचं हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली होती. तसंच महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असं दानवे म्हटले होते.

दानवेंच्या टीकेला गृहमंत्र्यांचं शायराना अंदाजात प्रत्युत्तर

“दानवे म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!

रावसाहेब दानवे यांची महाविकास आघाडीवर टीका

महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल, अशी जोरदार टीका दानवे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

दानवेंच्या टीकेला काँग्रेसचं उत्तर

रावसाहेब दानवेंच्या टीकेला काँग्रेसने देखील उत्तर दिलं आहे. “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत, असं भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” अशा शब्दात महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दानवेंना उत्तर दिलं होतं.

(Home Minister Anil Deshmukh reply Raosaheb Danve On his Amar Akbar Anthony Statement)

संबंधित बातम्या

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.