AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Update: अनधिकृत नळजोडणी नव्या वर्षात नियमित होणार, औरंगाबाद महापालिकेची अभय योजना

अवैध नळजोडणी नियमित करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने नव्या वर्षात अभय योजना जाहीर केली आहे.

Aurangabad Update: अनधिकृत नळजोडणी नव्या वर्षात नियमित होणार, औरंगाबाद महापालिकेची अभय योजना
Water connection
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 25, 2021 | 1:59 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad corporation) अनधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. शुक्रवारी यासाठी महापालिकेने एक ठराव घेतला. 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत ही योजना लागू राहिल. तसेच या कालावधीत नळ अधिकृत न घेणाऱ्या मालमत्ताधदारकांवर मनपा कारवाई करणार आहे.

काय आहे अभय योजना?

मनपा प्रशासनाने शुक्रवारी एक ठराव घेतला. त्यानुसार पाणीपुरवठा खंडित करण्याचे शुल्क, अवैध पाणी वापर शुल्क, अवैध जोडणी नियमितीकरण शुल्क, पुन्हा जोडणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दीड इंचापर्यंतच्या नळ जोडणीचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी निवासी सुल्क पाचशे रुपये तर व्यावसायिक शुल्क एक हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. दीडशेपेक्षा अधिक इंचाचे नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी निवासी शुल्क तीन हजार रुपये ठरवण्यात आले आहे. अवैध पाणी वापर शुल्क सरसकट पाच हजार असेल. नळ कनेक्शनची पुन्हा जोडणी शुल्क निवासी वापरासाठी पाचशे ते एक हजार रुपये आणि व्यावसायिक वापरासाठी एक हजार ते 2250 रुपये एवढी निश्चित कऱण्यात आली आहे.

मुख्य बाजारपेठातील अतिक्रमणांवर कारवाई

शहराती विविध भागातील बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर शुक्रवारी मनपाच्या वतीने बुलडोझर फिरवण्यात आले. जुनाबाजार, औरंगपुरा, गुलमंडीसह विविध भागातील 30 अतिक्रमणे पालिका पथकांकडून निष्कासित करण्यात आली.

इतर बातम्या-

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

atal bihari vajpayee birth anniversary: जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येतं हे वाजपेयींनी शिकवलं; राऊतांचा भाजपला टोला

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार