AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

काही भागांमध्ये उडदाची काढणी झाली आहे तर काही भागात ही कामे सुरु आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने उडदाचे दर वाढत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये दर हे वाढत आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या उडदाची योग्य कळजी घेतली तर शेतकऱ्यांना सुधारित दर मिळणार आहे. 3000 पासून 8000 पर्यंत उडदाला दर मिळत आहेत.

...म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 04, 2021 | 10:36 AM
Share

लातूर : खरीपातील मुख्य पीक असलेले सोयाबीन अजूनही पाण्यातच आहे. शेतकरी काढणीचे प्रयत्न करीत आहे पण सबंध शेतामध्ये पाणी साचल्याने प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे. खरीपातील केवळ उडीद पीकाने शेतकऱ्यांना तारलेले आहे. काही भागांमध्ये उडदाची काढणी झाली आहे तर काही भागात काढणी कामे ही सुरु आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने उडदाचे दर वाढत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये दर हे वाढत आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या उडदाची योग्य कळजी घेतली तर शेतकऱ्यांना सुधारित दर मिळणार आहे. 3000 पासून 8000 पर्यंत उडदाला दर मिळत आहेत.

उडीद उत्पादक राज्यांत मध्यंतरी जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम पिकाच्या गुणवत्तेवर झाला आहे. पावसामुळे उडीद हे डागाळलेले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात बाजारात आवक होणाऱ्या उडदामध्ये डागी माल हा अडचणीचा मुद्दा ठरत आहे. तसेच उडदाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे दिल्ली बाजारात उडदाच्या दरात 25 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात उडदाचे दर 6100 ते 7200 रुपयांदरम्यान होते.

महाराष्ट्रातील बाजार समित्यांत चालू सप्ताहात उडदाच्या दरात तेजी-मंदीचा अभाव होता. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 7000 पर्यंत दर मिळाला आहे. आवक कमी असली तरी दाखल होणाऱ्या उडदाला चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सोयाबनची कसर उडदाने काढली भरुन

दरवर्षी खरीपात सोयाबनच्या दरावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. यंदा मात्र, सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. तर उडदाला चांगला दर मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सोयाबीनच्या आगोदर काढणी झालेल्या उडदाने शेकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. शिवाय बाजारपेठेत उडदाची आवक सुरु झाल्यापासून दर हे स्थिर आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण सुरु आहे.

अशी घ्या काढणी झालेल्या पीकाची काळजी

* ज्या उडदाची काढणी ही पावसाच्या अगोदर झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी पीक साठवणूकीला हरकत नाही. जर उडीद डागाळलेला नाही त्याची साठवणूक केली तरी त्याच्या गुणवत्तेवर काही परिणाम हा होणार नाही. शिवाय भविष्यात दर वाढले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

* पीक साठवूण ठेवण्याची शेतकऱ्यांची क्षमता ही अधिक नसते. त्यामुळे पावसात भिजलेल्या उडदाची विक्री ही मिळेल त्या दरात करणे हेच शेतकऱ्यांच्या हीताचे राहणार आहे.

*वेअर हाऊस एक उत्तम पर्याय…शेती मालाची साठवणूक करण्यासाठी आता वेअर हाऊस उभारण्यात आलेली आहेत. शेतीमालाच्या साठवणूकीवर सध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम ही अदा केली जाते. त्यामुळे योग्य वेळी शेतीमालाला योग्य दर मिळणार आहे. तर धान्याचे नुकसानही होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बुलढाणा अर्बनचे वेअर हाऊस आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

*कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वेअर हाऊसची उभारणी करण्यात आलेली आहे. शिवाय येथे शेतीमालाची साठवणूक केल्यावर या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळते. आणि योग्य भाव झाल्यात त्याची विक्री केली जाते. यामुळे मिळालेल्या पैशाच्या जोरावर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे. (Increase in urad prices, proper care taken if farmers benefit more)

संबंधित बातम्या :

छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

तूर लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर, काय तूराचे फायदे अन् लागवड प्रक्रीया जाणून घ्या..

राजकीय स्वार्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...