AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. […]

पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे पाच सैनिक मारले आहेत. यासोबतच पाकिस्तानच्या पाच चैक्या उडवल्या आहेत.

बालाकोट, चकोटसह 13 दहशतवादी तळावर एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर शस्त्रसंधीच उल्लंघन मंगळवारी रात्रीपासून आणि बुधवारी सकाळीही करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून मनजोत पुंछ, नौशेरा राजौरी, अखनूर आणि सियालकोट सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे. भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक होत टँकचा वापर केला.

पाकिस्तानच्या पाच चौक्या भारतीय जवानांनी उडवून लावल्या आहेत. यामुळे पाकिस्तान आणखी आक्रमक होत सतत गोळीबार करत आहे. यामध्ये पाकिस्तानचे पाच सैन्यही मारले गेले आहेत, तर काहीजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गोळीबार सुरु असल्याने सीमेरेषेपासून पाच किमी अतंरावर असलेल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच पाचवी ते सातवी पर्यंतची परीक्षाही रद्द करण्यात आल आहे.

पंजाबमध्ये तणाव

पंजाब येथील भारतीय सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सीमारेषेचा दौरा करणार आहेत. सीमा रेषेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.